शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मनोज जरांगेंनी राजकीय भाष्य करू नये; बच्चू कडू यांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 08:15 IST

प्रत्येक गोष्ट सरकारमार्फत होते असं नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी जरांगेंनी केलेला आरोप खोडून काढला आहे.

मुंबई - Bacchu Kadu on Manoj Jarange Patil ( Marathi News )  जरांगे पाटलांनी जी भाषा वापरली ती आक्षेपार्ह आहे. त्याचे बिल्कुल समर्थन करणार नाही. जरांगे पाटलांनी आरक्षणाव्यतिरिक्त राजकीय भाष्य करू नये. समाजाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. राजकीय वादात त्यांनी पडू नये हे समाजासाठी अधिक फायदेशीर ठरेल. आरक्षणाबाबत काय असेल त्यावर बोलावे. मूळ गोष्टी सोडून बाहेरच्या विषयावर बोलू नये असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. 

आमदार बच्चू कडू म्हणाले की, आधी जरांगेंचं आंदोलन सरकारला जड होतं, आता सरकार जरांगेंवर भारी पडतंय हे दिसतं. एसआयटी चौकशी करायची तर ज्या अडीचशे लोकांच्या आत्महत्या झाल्या त्यावरही चौकशी करायला हवी. जरांगेंच्या मागील बोलविता धनी कोण, जाळपोळ, दगडफेक कुणी केली याचा शोध घेण्यास हरकत नाही पण ७५ वर्ष मागासलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे हा समाज मागे पडला. आता सगेसोयरेबाबत लोकांचा संभ्रम निघाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतली तशी प्रभू रामचंद्राची शपथ देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी असा टोला त्यांनी लगावला. 

तसेच  कुणाला विरोधात उभं करण्याची गरज नसते. प्रत्येकाची वैयक्तिक मते असतात. ज्यांना जी गोष्ट पटते ते ते करत असतात. प्रत्येक गोष्ट सरकारमार्फत होते असं नाही. सरकारने अधिसूचना काढली आहे. त्यावर प्रक्रिया सुरू आहे असं सांगत बच्चू कडू यांनी जरांगेंनी केलेल्या आरोपावर स्पष्टीकरण दिले. सरकार आपल्याविरोधात षडयंत्र रचतंय असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यावर कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दामुळे सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारी विधानसभेत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. जरांगेंचा बोलविता धनी कोण, दगडफेक कुणी करायला सांगितली, कोणत्या कारखान्यावर बैठक झाली यासारखे प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली. त्यावर छत्रपतींचे नाव घेऊन आई बहिणीवर शिवीगाळ करणे योग्य आहे का? यामागचं षडयंत्र आता बाहेर येईल असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी परखड भाष्य केले. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकाराचे गांभीर्य ओळखून मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिलेत. 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण