शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
2
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
4
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
5
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
6
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
7
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
8
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
9
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
10
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
11
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
12
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
13
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
14
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
15
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
16
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
17
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
18
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
19
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
20
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे

“लोकसभा नाही, विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात करणार, आरक्षण...”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 1:09 PM

Manoj Jarange Patil: सगळ्या पक्षांनी आणि जाती-धर्मांनी पाठिंबा दिला होता. यामुळे खासदार झाला असतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil: बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाने देशातील नागरिकांना न्याय दिला आहे. माझा राजकीय मार्ग नाही. लोकचळवळीचा मार्ग मला माहिती आहे. मी कुठल्याच पक्षाचा नाही. लोकसभेत आम्ही उतरलो नाही, परंतु विधानसभेची तयारी जोरात करणार आहोत, असे मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

मराठा बांधव कोणाच्या सभांना जात नाही. ते फक्त मजा बघत आहेत. ते उमेदवारांना पाडणार आहेत. तो आमचा मोठा विजय होणार आहे. आम्हाला वेळ कमी होता. लोकसभा निवडणूक खूप मोठी असते. त्याचे कार्यक्षेत्र मोठे असते, असे सांगत जून महिन्यापर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर ६ जूनपासून पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला.

बहुमताशिवाय राजकारणाला किंमत नाही, राजकारण आपले क्षेत्र नाही

बहुमताशिवाय राजकारणाला किंमत नाही. भावनेच्या जीवावर राजकारणात मत घेता येत नाही. मी निवडणूक लढणार नाही. मला मराठा बांधव महत्त्वाचा आहे. सगळ्या पक्षांनी आणि जाती-धर्मांनी पाठिंबा दिला होता. यामुळे खासदार झाला असतो. परंतु राजकारण हे आपले क्षेत्र नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

दरम्यान, महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले. आज देऊ, उद्या देऊ असे करून सात महिने झाले. मराठ्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांना अतिप्रेम आहे. इतके प्रेम उफाळून येते की, त्यांचे काही सांगता येत नाही. मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सात महिन्यांआधीचे गुन्हे काढले जात आहेत. गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बढती दिली. त्यामुळे गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखी कामगिरी आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण