शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

“छगन भुजबळ मंत्रिमंडळाला अन् राज्याला लागलेला कलंक”; मनोज जरांगेंची सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 15:17 IST

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव खराब करायचे आहे, असा दावा करत मनोज जरांगे यांनी टीका केली.

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम देत २० जानेवारी रोजी कोट्यवधी मराठा समाजातील बांधवांसह मुंबईला धडकण्याचा निर्धार केला आहे. तसेच ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळावे, यावर मनोज जरांगे ठाम आहेत. मात्र, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, असे छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले आहे. बीड येथे आयोजित एल्गार मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेचा मनोज जरांगे पाटील यांनी खरपूर शब्दांत समाचार घेतला.

ते राष्ट्रीय नेत्यांना सांगत आहेत की आमच्या मुंबईतील मोर्चाच्या पाठिशी उभे राहा. ते नेतेही म्हणतात आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. त्या नेत्यांना सांगायचे आहे, तुम्ही कोणाच्याही पाठिशी उभे राहा. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तुम्ही मराठा समाजाच्या पाठिशी उभे असाल तर त्याला माझी काही हरकत नाही. परंतु, ते म्हणतात की ओबीसीतूनच आरक्षण घेणार. त्यांची अशी भूमिका असेल तर त्यांना स्पष्ट सांगायचे आहे की, तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. ओबीसीतून मराठा सामाजाला आरक्षण मिळणार नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

छगन भुजबळ मंत्रिमंडळाला अन् राज्याला लागलेला कलंक

छगन भुजबळांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव खराब करायचे आहे. त्यांच्या मनात पहिल्यापासूनच मराठ्यांविषयी पाप आहे, विष आहे. आता या वक्तव्यांमधून बाहेर येत आहे. यापूर्वी राजकीय स्वर्थासाठी तुम्ही महाराजांचा वापर केलात. आता तुमचे पोट भरले आहे. म्हणून त्यांचे नाव खराब करत आहात. हा वेडा माणूस आहे. याआधीही त्याने महापुरुषांची नावे घेऊन त्यांच्या जाती काढल्या होत्या. हा मंत्रिमंडळाला आणि राज्याला लागलेला कलंक आहे. याला मंत्रिमंडळात ठेवू नये. परंतु, त्याला हे लोक का सांभाळत आहेत तेच कळत नाही. त्यांनी भुजबळाचा उदो उदो का चालवलाय ते माहिती नाही. त्याचे लाड का पुरवले जातायत तेच कळत नाही. परंतु, त्याचे लाड पुरवणाऱ्यांना हे प्रकरण जड जाणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, मराठा आंदोलनाच्या काळात बीडमधील काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळेच भुजबळ यांनी बीडमध्ये हा एल्गार मेळावा घेतला. यावेळी भुजबळ म्हणाले, छत्रपतींचे नाव घेऊन बीडमध्ये जाळपोळ करण्यात आली. यावर, मनोज जरांगे भुजबळांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले, त्याला हे कोणी सांगितले? मला वाटते त्याच्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, कारण त्याला बुद्धी नाही. आता मराठ्यांवर आरोप करतोय, छत्रपतींचे नाव घेतोय, असा पलटवार मनोज जरांगे यांनी केला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळ