शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

जरांगेंचा थेट फडणवीसांना फोन! कोणत्या विषयावर झाली चर्चा? आरक्षणावर काय बोलणे झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 18:07 IST

Manoj Jarange Patil Make Phone Call to BJP DCM Devendra Fadnavis: शेतकऱ्यांच्या कानावर सरसकट शब्द गेलेला आहे. तसे झाले नाही तर शेतकरी तुम्हाला पाडल्याशिवाय सोडत नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

Manoj Jarange Patil Make Phone Call to BJP DCM Devendra Fadnavis: पाडायचे की उभे करायचे, याचा निर्णय मराठा समाज घेणार आहे. मराठ्यांच्या नादी लागणे सोपे नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नादी लागू नये. केवळ पाडा म्हणालो होतो, तर एवढ्यांना पाडले. पण आता नावे घेणार. त्यावेळेस मग अवघड होईल. प्रत्येक मतदारसंघात मराठे आहेत, हे लक्षात ठेवा. मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

तत्पूर्वी मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले एक लाखाचे आणि तुम्ही देणार पाच हजार रुपये, नुकसान झाले १० लाखाचे आणि तुम्ही मदत दिली, १२-१३ हजारांची, कुणाचे २० हजार रुपयाचे नुकसान झाले आणि तुम्ही ७००-८०० रुपयांची मदत दिली, असे नको. जे नुकसान झाले, त्याची सगळी आणि सरसकट भरपाई दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे आणि शिंदेंच्या वतीने अब्दुल सत्तार होते, त्यांनाही सांगितले आहे. कृषी मंत्री असतील, त्यांना सांगितले आहे. त्यांनी शब्दच दिलाय की, सरसकट मदत करतो म्हणून, असे जरांगे यांनी सांगितले.

तुम्हाला शेतकरी पाडल्याशिवाय सोडत नाही

देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना आठ दिवसात मदत द्या, असं मी त्यांना बोललो. तुम्ही मदत देत असताना म्हणत असाल, आठ दिवसांनी देतो, दहा दिवसांनी देतो आणि देताना दोन वर्षांनी देतात. तर तुम्हाला शेतकरी पाडल्याशिवाय सोडत नाही. शेतकऱ्यांच्या कानावर सरसकट शब्द गेलेला आहे. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत कोण किती लबाड बोलते हे कळेल. शेतकऱ्यांची कोणीही फसवणूक करू शकत नाही. त्यांनी शेतकऱ्यांना फसवले, हे समजायचे की शेतकरी त्यांना फसवणार आहेत, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलताना आरक्षणावर चर्चा झाली नाही, असे जरांगे म्हणाले.

दरम्यान, २२ ते २३ मतदारसंघ सोडले तर लाखोंच्या घरात सर्व ठिकाणी मराठा समाज आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही पुढच्या काळात मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या कामाला लागा. मराठ्यांच्या विरोधात जायचे काम करू नका. कारण आता मराठे निर्णय घेणार आहेत. एकदा निर्णय झाला की, लोकसभेला कचका दाखवला आहे, याची आठवण जरांगे यांनी करून दिली.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस