शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय?
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
4
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
5
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
6
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
7
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
8
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
9
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
10
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
11
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
12
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
13
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
14
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
15
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
16
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
17
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
18
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
19
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
20
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

जरांगेंचा थेट फडणवीसांना फोन! कोणत्या विषयावर झाली चर्चा? आरक्षणावर काय बोलणे झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 18:07 IST

Manoj Jarange Patil Make Phone Call to BJP DCM Devendra Fadnavis: शेतकऱ्यांच्या कानावर सरसकट शब्द गेलेला आहे. तसे झाले नाही तर शेतकरी तुम्हाला पाडल्याशिवाय सोडत नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

Manoj Jarange Patil Make Phone Call to BJP DCM Devendra Fadnavis: पाडायचे की उभे करायचे, याचा निर्णय मराठा समाज घेणार आहे. मराठ्यांच्या नादी लागणे सोपे नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नादी लागू नये. केवळ पाडा म्हणालो होतो, तर एवढ्यांना पाडले. पण आता नावे घेणार. त्यावेळेस मग अवघड होईल. प्रत्येक मतदारसंघात मराठे आहेत, हे लक्षात ठेवा. मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

तत्पूर्वी मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले एक लाखाचे आणि तुम्ही देणार पाच हजार रुपये, नुकसान झाले १० लाखाचे आणि तुम्ही मदत दिली, १२-१३ हजारांची, कुणाचे २० हजार रुपयाचे नुकसान झाले आणि तुम्ही ७००-८०० रुपयांची मदत दिली, असे नको. जे नुकसान झाले, त्याची सगळी आणि सरसकट भरपाई दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे आणि शिंदेंच्या वतीने अब्दुल सत्तार होते, त्यांनाही सांगितले आहे. कृषी मंत्री असतील, त्यांना सांगितले आहे. त्यांनी शब्दच दिलाय की, सरसकट मदत करतो म्हणून, असे जरांगे यांनी सांगितले.

तुम्हाला शेतकरी पाडल्याशिवाय सोडत नाही

देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना आठ दिवसात मदत द्या, असं मी त्यांना बोललो. तुम्ही मदत देत असताना म्हणत असाल, आठ दिवसांनी देतो, दहा दिवसांनी देतो आणि देताना दोन वर्षांनी देतात. तर तुम्हाला शेतकरी पाडल्याशिवाय सोडत नाही. शेतकऱ्यांच्या कानावर सरसकट शब्द गेलेला आहे. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत कोण किती लबाड बोलते हे कळेल. शेतकऱ्यांची कोणीही फसवणूक करू शकत नाही. त्यांनी शेतकऱ्यांना फसवले, हे समजायचे की शेतकरी त्यांना फसवणार आहेत, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलताना आरक्षणावर चर्चा झाली नाही, असे जरांगे म्हणाले.

दरम्यान, २२ ते २३ मतदारसंघ सोडले तर लाखोंच्या घरात सर्व ठिकाणी मराठा समाज आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही पुढच्या काळात मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या कामाला लागा. मराठ्यांच्या विरोधात जायचे काम करू नका. कारण आता मराठे निर्णय घेणार आहेत. एकदा निर्णय झाला की, लोकसभेला कचका दाखवला आहे, याची आठवण जरांगे यांनी करून दिली.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस