शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
3
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
4
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
5
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
6
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
7
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
8
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
9
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
10
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
11
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
12
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
13
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
14
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
15
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
16
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
17
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
18
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
19
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
20
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 11:51 IST

अजितदादा प्रत्येकवेळी प्रचंड मोठी चूक करतायेत. जातीयवादी लोकं पोसण्याचे काम अजितदादा करतायेत. का करतायेत हे कळत नाही असं जरांगे यांनी म्हटलं.

छत्रपती संभाजीनगर - जातीवादी लोकांना पोसण्याचं काम अजितदादा का करत आहेत हे कळत नाही. अजितदादांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. मराठा आरक्षणाचे मारेकरी अजितदादा मंत्रि‍पदी घेत असतील तर यापुढे मराठ्यांनाही एकजूट व्हावे लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतल्यानंतर दिली आहे.

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, छगन भुजबळांना मंत्री बनवणे हा त्यांच्या पक्षातंर्गतला प्रश्न आहे. ते पहिलेही मंत्री होते आणि आताही मंत्री झालेत. आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीयवादी तणाव निर्माण करायचा हे अजितदादांना का कळत नाही. अजितदादांचे जे आमदार आहेत, त्यांनाही हे कळत नाही. त्यांच्या मतदारसंघात मराठा समाजाची जी पोरं आहेत, त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत. शिक्षण मिळणार आहे, सुविधा मिळणार आहेत. त्या मिळू नये म्हणून भुजबळ प्रयत्न करतायेत. जातीयवादी लोक पोसण्याचा अजितदादांचा हा काय प्रकार आहे कळत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच अजितदादांना यासाठी खूप मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. अजितदादा प्रत्येकवेळी प्रचंड मोठी चूक करतायेत. जातीयवादी लोकं पोसण्याचे काम अजितदादा करतायेत. का करतायेत हे कळत नाही. मराठा समाजाला आशा होती, अजितदादा असतील, शिंदे आहेत त्यामुळे आरक्षणाला कुठे फाटा बसणार नाही. परंतु आरक्षणाला विरोध करतायेत त्याला मंत्रि‍पदी घेतले जातेय. परंतु कदाचित छगन भुजबळांना हा तात्पुरता आनंद दिला असावा असं वाटते. मराठा आरक्षणाचे मारेकरी यांना अजितदादा मंत्रि‍पदी घेत असतील. जातीजातीत टोळी निर्माण करणाऱ्यांना मंत्रिपद दिले जात असेल तर मराठ्यांना यापुढच्या काळात एकजूट व्हावे लागणार आहे. आमदार, मंत्र्‍यांसह सर्व मराठा समाजाच्या पोरांना आरक्षणाची गरज आहे. अजितदादा जाणीवपूर्वक असं का करतायेत करत नाही. कदाचित जिल्हा परिषदा निवडणुका असतील त्यामुळे तात्पुरता आनंद दिला असेल. त्यानंतर त्यांच्या आनंदावर शंभर टक्के विरजन पडेल अशी शंका आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

वापरून फेकून देणारा माणूस फडणवीस

दरम्यान, अजितदादांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. अजितदादांच्या आमदारांनी विरोध करायला हवा होता. त्यांच्या मतदारसंघातही  मराठा समाज मोठा आहे. हा डाव देवेंद्र फडणवीसांचा असू शकतो. जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यासाठी गोंजारण्याचे काम केले असेल. मराठा संपवण्याचा विडा फडणवीसांनी घेतला आहे हे सर्व पक्षातील मराठा आमदारांना कळणे गरजेचे आहे. आमदारकी, मंत्रि‍पदे मिळाली म्हणून ते मान्य करणार नाहीत. परंतु त्यांच्या मनात मात्र हे खरे आहे असं म्हणत असतील. ज्या माणसाने फडणवीसांना पुन्हा प्रवाहात आणले त्या शिंदेंनाही वापरून बाजूला केले. काम झाले की वापरून फेकून देणारा माणूस फडणवीस आहे अशी टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.   

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षण