शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 11:51 IST

अजितदादा प्रत्येकवेळी प्रचंड मोठी चूक करतायेत. जातीयवादी लोकं पोसण्याचे काम अजितदादा करतायेत. का करतायेत हे कळत नाही असं जरांगे यांनी म्हटलं.

छत्रपती संभाजीनगर - जातीवादी लोकांना पोसण्याचं काम अजितदादा का करत आहेत हे कळत नाही. अजितदादांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. मराठा आरक्षणाचे मारेकरी अजितदादा मंत्रि‍पदी घेत असतील तर यापुढे मराठ्यांनाही एकजूट व्हावे लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतल्यानंतर दिली आहे.

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, छगन भुजबळांना मंत्री बनवणे हा त्यांच्या पक्षातंर्गतला प्रश्न आहे. ते पहिलेही मंत्री होते आणि आताही मंत्री झालेत. आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीयवादी तणाव निर्माण करायचा हे अजितदादांना का कळत नाही. अजितदादांचे जे आमदार आहेत, त्यांनाही हे कळत नाही. त्यांच्या मतदारसंघात मराठा समाजाची जी पोरं आहेत, त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत. शिक्षण मिळणार आहे, सुविधा मिळणार आहेत. त्या मिळू नये म्हणून भुजबळ प्रयत्न करतायेत. जातीयवादी लोक पोसण्याचा अजितदादांचा हा काय प्रकार आहे कळत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच अजितदादांना यासाठी खूप मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. अजितदादा प्रत्येकवेळी प्रचंड मोठी चूक करतायेत. जातीयवादी लोकं पोसण्याचे काम अजितदादा करतायेत. का करतायेत हे कळत नाही. मराठा समाजाला आशा होती, अजितदादा असतील, शिंदे आहेत त्यामुळे आरक्षणाला कुठे फाटा बसणार नाही. परंतु आरक्षणाला विरोध करतायेत त्याला मंत्रि‍पदी घेतले जातेय. परंतु कदाचित छगन भुजबळांना हा तात्पुरता आनंद दिला असावा असं वाटते. मराठा आरक्षणाचे मारेकरी यांना अजितदादा मंत्रि‍पदी घेत असतील. जातीजातीत टोळी निर्माण करणाऱ्यांना मंत्रिपद दिले जात असेल तर मराठ्यांना यापुढच्या काळात एकजूट व्हावे लागणार आहे. आमदार, मंत्र्‍यांसह सर्व मराठा समाजाच्या पोरांना आरक्षणाची गरज आहे. अजितदादा जाणीवपूर्वक असं का करतायेत करत नाही. कदाचित जिल्हा परिषदा निवडणुका असतील त्यामुळे तात्पुरता आनंद दिला असेल. त्यानंतर त्यांच्या आनंदावर शंभर टक्के विरजन पडेल अशी शंका आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

वापरून फेकून देणारा माणूस फडणवीस

दरम्यान, अजितदादांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. अजितदादांच्या आमदारांनी विरोध करायला हवा होता. त्यांच्या मतदारसंघातही  मराठा समाज मोठा आहे. हा डाव देवेंद्र फडणवीसांचा असू शकतो. जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यासाठी गोंजारण्याचे काम केले असेल. मराठा संपवण्याचा विडा फडणवीसांनी घेतला आहे हे सर्व पक्षातील मराठा आमदारांना कळणे गरजेचे आहे. आमदारकी, मंत्रि‍पदे मिळाली म्हणून ते मान्य करणार नाहीत. परंतु त्यांच्या मनात मात्र हे खरे आहे असं म्हणत असतील. ज्या माणसाने फडणवीसांना पुन्हा प्रवाहात आणले त्या शिंदेंनाही वापरून बाजूला केले. काम झाले की वापरून फेकून देणारा माणूस फडणवीस आहे अशी टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.   

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षण