शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

सरकार मराठ्यांचा छळ का करतंय?; मनोज जरांगे पाटील संतापले, मुख्यमंत्र्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 16:35 IST

आम्ही १० टक्के आरक्षण मागितले नाही, ओबीसीतलं आरक्षण मागितले. कुणबी नोंदी शोधायचं काम बंद झाले, मराठ्यांचा छळ सरकार का करतंय असा सवाल जरांगेंनी विचारला. 

जालना - २६ जानेवारीला सगेसोयरेची अधिसूचना काढून १ वर्ष पूर्ण होतंय, परंतु याची अंमलबजावणी करायला वर्षभर का लागला. गोरगरीब लेकरांचे प्रश्न का मार्गी लावला जात नाही. आमच्या लेकरांची स्वप्ने साकार करण्यासाठी आम्ही टाहो फोडतोय. गरीब मराठ्यांना किती राबावे लागते, आमची पोरं डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकत नाही. आम्हाला आरक्षणाची गरज आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळालीच पाहिजे. हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे संस्थानचं मूळ गॅझेट लागू केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असं सांगत आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसीतूनच द्यावे अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची मुलाखत घेतली. त्यात मराठा आरक्षण आणि संतोष देशमुख प्रकरणावरून त्यांनी सरकारला इशारा दिला. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने दिलेले आरक्षण टिकणारं नाही. ते आरक्षण ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडते. ५० टक्क्यावरचं आरक्षण टिकणार नाही त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण मागतोय. १८८४ पासून आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत. घर आमच्यावर नावावर आहे तुम्ही घुसलोय. एक दोन ओबीसींमध्ये अतातायीपणा आहे. SEBC आरक्षण तुम्ही दिले, विद्यार्थ्यांचे पहिले सत्र झाले, आम्ही हे आरक्षण मागितले नसताना ते सरकारने दिले. SEBC च्या अंतर्गत पोरांनी प्रवेश घेतले. आता त्या लाखो पोरांना शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप मिळत नाही. आता कॉलेज १०० टक्के फीस मागायला लागलेत असा आरोप त्यांनी केला. 

त्याशिवाय तुम्ही मुलींना मोफत शिक्षण केले, कालच माझ्याकडे एक अर्ज आला. पुण्यातील वाघोलीतल्या कॉलेजनं एका मुलीला पत्र लिहून अद्याप मुलींना मोफत शिक्षणाची अंमलबजावणी झाली नाही असं कळवले. कोल्हापूरच्या भाजपा जिल्हाध्यक्षानेही पत्र देऊन मुलीचा प्रवेश रद्द करू नये असं कॉलेजकडे मागणी केली आहे. हा इतका बोगस प्रकार आहे. आम्ही १० टक्के आरक्षण मागितले नाही, ओबीसीतलं आरक्षण मागितले. कुणबी नोंदी शोधायचं काम बंद झाले, मराठ्यांचा छळ सरकार का करतंय, आमच्या हक्काचं आरक्षण दिले जात नाही असा निशाणा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर साधला.

दरम्यान, बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी एकही आरोपी सुटणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय म्हणून मराठे शांत बसले आहेत. आमच्याशी दगाफटका व्हायला लागलाय आणि सरकारमधील एक मंत्री सांभाळण्यासाठी खून पचवायचा आहे आणि आरोपी सुटले तर आम्ही रस्त्यावर येऊ. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही कुठलीही काटकसर करायची नाही. देशमुख कुटुंबीय देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर गेले. त्या कुटुंबावर अन्याय होणार नाही असं वाटतं. या धनंजय मुंडेंच्या टोळ्या आहेत त्यांना सांभाळण्याची गरज काय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्‍यांना विचारला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण