शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

माझ्या टप्प्यात आला तर वाजवणारच...; मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 17:50 IST

जातीजातीत दंगली भडकवण्याच्या भाषा तुम्ही केली. परंतु मराठे राज्यात जातीय दंगली होऊ देणार नाही असा विडाच आम्ही खांद्यावर उचलला आहे असं जरांगे म्हणाले.

नाशिक - २०२३ चा मराठ्यांचा लढा उभा राहिला आणि कुणबी नोंदीचे पुरावे सापडले. मराठा समाजाचे लेकरं हुशार असूनही आरक्षण नसल्याने उच्च पदावर जाण्याऐवजी छोट्या छोट्या पदावर काम करावं लागले. ज्यांची लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करायची वेळ मराठा मुलांवर आली.माझ्या टप्प्यात आला तर वाजवणारच. जनतेचे पैसे तुम्ही खाल्ले, महाराष्ट्र सदनासह सर्व लुटले म्हणून तुम्ही जेलमध्ये गेला. लोकांचा तळतळाट लागला. ज्यांची लायकी नाही त्यांचे नाव मी घेत नाही. अगोदर त्यांच्या विचाराला आमचा विरोध होता. व्यक्ती म्हणून नको. माझा प्रामाणिकपणा समाजाला सिद्ध करून दिला आहे. मी खरेच बोलतो. वैचारिक विचार, मतभेद असायला हवे. आता व्यक्ती म्हणूनही त्यांना आपला विरोध आहे. जो माणूस घटनेच्या, कायद्याच्या पदावर बसलाय तो माणूस कायदा पायदळी तुडवायला लागला. जातीजातीत दंगली, मराठा-ओबीसीत वाद होतील अशी विधाने करू लागला. कायदा सांभाळण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही दंगली होतील अशी विधाने करतायेत हा कसला तुमचा वैचारिक वारसा? अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे. 

मनोज जरांगे पाटील हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.त्यावेळी जरांगेंनी भुजबळांवर जोरदार प्रहार केले. जरांगे पाटील म्हणाले की, तुमच्या पोटातील गटारगंगा तुम्ही बाहेर काढली आणि स्वत:ची लायकी दाखवली. जातीजातीत दंगली भडकवण्याच्या भाषा तुम्ही केली. परंतु मराठे राज्यात जातीय दंगली होऊ देणार नाही असा विडाच आम्ही खांद्यावर उचलला आहे. मी संयम ठेवलाय, मी कुणाचं ऐकून घेत नाही. राजकीय स्वार्थासाठी मराठा-ओबीसीत दंगल घडवायची हा ह्यांचा हेतू. पण यांचे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही हे मी ठरवले. त्यामुळे मी काहीच उत्तर देत नाही. गावखेड्यातील ओबीसी बांधवांची भावना आहे की, मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर त्यांना आरक्षण द्यायला हवे अशी त्यांना वाटते. आजही गावखेड्यात मराठा-ओबीसी बांधव एकमेकांच्या मदतीला धावून जातायेत असं त्यांनी म्हटलं. 

तसेच मराठा समाजाला आरक्षण होतं, तरीही मराठ्यांना जाणुनबुजून दिले नाही. नुसतं बोंबलत बसायचं ही खानदानी मराठ्यांची संस्कृती नाही. किती दिवस मतभेद ठेवणार? मला अनेक फोन येतात, तुमच्या गाडीत हा नको, तो नको, त्याच्यापासून लांब जा, अरे बसू द्या. मी जास्त वळवळ करून देत नाही. माझी भूमिका समाजाला आरक्षण मिळवून द्यायची आहे. जातीसाठी एकी हवी. गोरगरिबांच्या लेकरांना आयुष्याची भाकरी द्यायची त्यासाठी ही लढाई आहे. आता काय व्हायचे ते होऊ द्या, सुट्टीच नाय...माझ्या ताफ्यात जेवढ्या गाड्या आहेत त्यांच्यात स्वत: डिझेल टाकायचे, मराठ्यांनी कुणाकडे पैसे मागायचे नाहीत. जर कुणी पैसे घेत असेल तर मला सांगा, त्याचा कार्यक्रमच करतो. इथे जातीसाठी न्याय मागतोय. अंतरवालीत शांततेत आंदोलन सुरू होते. काय झालं माहिती नाही. पण २५ व्यादिवशी आमच्यावर प्राणघातक हल्ला झाला, आयाबहिणींची डोके फोडण्यात आले. पोरांच्या छातीत गोळ्या घातल्या असा आरोप जरांगे पाटलांनी केला. 

दरम्यान, ४-५ दिवसांनी मला फोन यायला लागले, दादा आता रक्त सांडलंय, पण आता मागे हटायचे नाही. आरक्षण मिळवायचे. ते आंदोलन आजही शांततेत सुरू आहे. आमच्यावर का हल्ला केला याचे उत्तर आजही सरकारला देता आले नाही. ज्यांच्यावर हल्ला झाला, मारपण आम्ही खाल्ला, आमच्यावर ३०७, १२० ब सारखी कलमे लावली. जालनात कट नेमका कुणी रचला? लाठीचार्जचे आदेश कुणी दिले त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता.ओबीसीत एखादी जात घ्यायची असेल तर ती मागास असायला हवी. १९६७ ला व्यवसायावर आधारित जाती निर्माण केले आणि आरक्षण दिले. व्यवसायावर आधारित आरक्षण दिले मग मराठ्यांना का नाही? मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? मराठ्यांची पोरं मोठी होऊ द्यायची नाही हे षडयंत्र होते, मराठ्यांनी विश्वास ठेवला आणि गाफील राहिले असंही जरांगे पाटील बोलले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळOBCअन्य मागासवर्गीय जाती