शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मनोज जरांगेच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त लोणावळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 12:25 IST

मराठ्याचं भगवं वादळ मुंबईत धडकण्यापूर्वी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेली मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा बुधवारी पुण्यात १० तास सुरू होती. पुण्यात मनोज जरांगे पाटील यांना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर सरकारीच्या हालचाली वाढल्या आहेत. मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत धडकण्यापूर्वी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. तसेच, गेल्या तासाभरापासून छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांची मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. 

आज मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा लोणावळ्यात आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड हे लोणावळ्यात दाखल झाले असून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करत आहे. तसेच, राज्य सरकारच्यावतीने आरक्षणाच्या मागणीवर चर्चा होणार आहे. याबाबत मधुकर राजे अर्दड एका वृत्त वाहिनीला माहिती दिली. ते म्हणाले, शासनाचे आदेश घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरु आहे. तसेच, आजची चर्चा  सकारात्मक होईल आणि मनोज जरांगे पाटील यांचे समाधान होईल, असा विश्वास मधुकर राजे अर्दड यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, बुधवारी मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेली मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा पुण्यात १० तास सुरू होती. नागरिकांकडून होणारे स्वागत, बघ्यांची गर्दी यामुळे पदयात्रा निघालेल्या रस्त्याला पालखी यात्रेचेच स्वरूप आले होते. प्रचंड गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. मात्र, रस्त्याची एक बाजू मोकळी ठेवून आंदोलक व त्यांची वाहने जात असल्यामुळे शिस्तीचेही दर्शन पुणेकरांना घडले. वाघोलीवरून सकाळी ११ वाजता निघालेली ही यात्रा रात्री ९ नंतर शहरातून लोणावळ्याकडे रवाना झाली. दरम्यान, लोणावळा शहराजवळील वाकसई चाळ येथे मनोज जरांगे-पाटील यांची सभा होणार आहे. या सभेसाठी १३० एकरचे, तर वाहनतळासाठी १५० एकरचे मैदान तयार करण्यात आले.

नवी मुंबईत मार्ग बदललानवी मुंबईत येणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा मार्ग बदलला आहे. जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन मोर्चा पनवेलमध्ये दाखल होणार आहे. सायन - पनवेल मार्गाचा वापर न करता पनवेल बाहेरील पळस्पे फाटा मार्गे जेएनपीटी रस्त्यावरून उलवे मार्गे पामबीच मार्गावर दाखल होणार आहे. मराठा मोर्चाचा मार्ग बदलला असल्याने पनवेल , कामोठे , कंळंबोली , खारघर मधील वाहतूक कोंडी न होता  मुंबई - पुणे हायवेवरील वाहतूक सुरळीत चालणार आहे. आज हा मोर्चा पनवेलमध्ये मुक्कामी असणार आहे. तसेच या कार्यकर्त्यांसाठी पनवेल आणि रायगड जिल्ह्यातून 10 लाख भाकरी आणि चपात्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाlonavalaलोणावळा