शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

साताऱ्यात शरद पवारांना मोठा धक्का; जिल्ह्यातील वजनदार नेत्याचा भाजपात पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 17:19 IST

साताऱ्यातील शरद पवार गटाचे नेते भाजपात सहभागी, जिल्ह्यात बसणार फटका 

मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत अशावेळी राज्यातील सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यात साताऱ्यातील शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी सोमवारी भाजपात पक्षप्रवेश केला. सोनवलकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला असून या प्रवेशामुळे फलटण तालुक्यात भाजपाची ताकद वाढणार आहे. 

रामराजे नाईक निंबाळकर यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून माणिकराव सोनवलकर हे राजे गटासोबत सक्रीय होते. फलटण तालुक्यात सोनवलकर यांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. पक्षफुटीनंतर ते शरद पवारांसोबत कायम होते. ते जिल्हा परिषदेचे नेते असून आज ५ हजार कार्यकर्त्यांसह भाजपात सहभागी झाले अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

कोण आहेत माणिकराव सोनवलकर?

सुरुवातीला काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सोनवलकर हे राजकारणात सक्रीय आहेत. रामराजे गटाचे ते समर्थक मानले जातात. ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद अध्यक्ष असा त्यांना सातारा जिल्ह्यातील राजकारणात प्रवास राहिला. फलटण, कोरेगाव तालुक्यात माणिकराव सोनवलकर यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. 

अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामराजे गट भाजपाच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवर नाराज होता. त्यांनी निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत केल्याची चर्चा होती. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी राजे गटातील माणिकराव सोनवलकर यांना भाजपात आणून फलटणमध्ये रामराजेंना धक्का दिल्याचं बोललं जाते. 

दरम्यान, महाराष्ट्रात काही दिवसांत विधानसभा निवडणुका लागणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यातील सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. दोन्ही युती, आघाड्यांमध्ये जागावाटपावरून बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यात अनेक नेते, अपक्ष यांच्या राजकीय उड्याही पाहायला मिळत आहे. 

"समासमाजात भांडण लावण्याचं काम मविआ करतंय"

आगामी निवडणुकीला ध्यानात ठेवून महाविकास आघाडीत राज्यात समाजासमाजात भांडणं लावण्याचं काम करतेय हे राज्यातील जनतेला दिसतंय. जेव्हा जेव्हा काँग्रेस सरकार राज्यात असायचे विरोधी पक्षाने असं घाणेरडे राजकारण कधीच केले नाही. काँग्रेसविरोधातील सरकार जेव्हाही बनते, मग देश असो वा राज्य. या लोकांची मानसिकता समाजात फूट पाडणे, भांडणे लावणे हे आहे. सत्तेशिवाय काँग्रेस राहू शकत नाही. सरकारची प्रतिमा मलिन करणे. जनतेत भ्रम निर्माण करणे हे काम काँग्रेस करतंय असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.  

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४