शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
3
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
4
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
5
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
6
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
7
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
9
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
10
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
11
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
12
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
13
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
14
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
15
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
16
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
17
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
18
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
19
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
20
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड

साताऱ्यात शरद पवारांना मोठा धक्का; जिल्ह्यातील वजनदार नेत्याचा भाजपात पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 17:19 IST

साताऱ्यातील शरद पवार गटाचे नेते भाजपात सहभागी, जिल्ह्यात बसणार फटका 

मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत अशावेळी राज्यातील सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यात साताऱ्यातील शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी सोमवारी भाजपात पक्षप्रवेश केला. सोनवलकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला असून या प्रवेशामुळे फलटण तालुक्यात भाजपाची ताकद वाढणार आहे. 

रामराजे नाईक निंबाळकर यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून माणिकराव सोनवलकर हे राजे गटासोबत सक्रीय होते. फलटण तालुक्यात सोनवलकर यांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. पक्षफुटीनंतर ते शरद पवारांसोबत कायम होते. ते जिल्हा परिषदेचे नेते असून आज ५ हजार कार्यकर्त्यांसह भाजपात सहभागी झाले अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

कोण आहेत माणिकराव सोनवलकर?

सुरुवातीला काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सोनवलकर हे राजकारणात सक्रीय आहेत. रामराजे गटाचे ते समर्थक मानले जातात. ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद अध्यक्ष असा त्यांना सातारा जिल्ह्यातील राजकारणात प्रवास राहिला. फलटण, कोरेगाव तालुक्यात माणिकराव सोनवलकर यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत. 

अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामराजे गट भाजपाच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवर नाराज होता. त्यांनी निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत केल्याची चर्चा होती. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी राजे गटातील माणिकराव सोनवलकर यांना भाजपात आणून फलटणमध्ये रामराजेंना धक्का दिल्याचं बोललं जाते. 

दरम्यान, महाराष्ट्रात काही दिवसांत विधानसभा निवडणुका लागणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यातील सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. दोन्ही युती, आघाड्यांमध्ये जागावाटपावरून बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यात अनेक नेते, अपक्ष यांच्या राजकीय उड्याही पाहायला मिळत आहे. 

"समासमाजात भांडण लावण्याचं काम मविआ करतंय"

आगामी निवडणुकीला ध्यानात ठेवून महाविकास आघाडीत राज्यात समाजासमाजात भांडणं लावण्याचं काम करतेय हे राज्यातील जनतेला दिसतंय. जेव्हा जेव्हा काँग्रेस सरकार राज्यात असायचे विरोधी पक्षाने असं घाणेरडे राजकारण कधीच केले नाही. काँग्रेसविरोधातील सरकार जेव्हाही बनते, मग देश असो वा राज्य. या लोकांची मानसिकता समाजात फूट पाडणे, भांडणे लावणे हे आहे. सत्तेशिवाय काँग्रेस राहू शकत नाही. सरकारची प्रतिमा मलिन करणे. जनतेत भ्रम निर्माण करणे हे काम काँग्रेस करतंय असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.  

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४