शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

“लवकरच महायुतीत मोठी गडबड शक्य, देवेंद्र फडणवीसांनी हात वर केलेत”; काँग्रेसचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 11:59 IST

Congress Nana Patole News:

Congress Nana Patole News: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यातच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काही सर्व्हेनुसार, लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महाविकास आघाडी बाजी मारण्याचा अंदाज आहे. तर काही कमी फरकाने महायुतीला सत्ता राखण्यात यश येईलच असे नाही, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. यातच लवकरच महायुतीत काही गडबड शक्य आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महायुती संदर्भात हात वरती केलेत, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत एकवाक्यता नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना आवाहन करूनही मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत स्पष्ट भूमिका घेताना कुणी दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी हाच चेहरा राहणार आहे. बैठकीत आम्ही हे जाहीरपणे सांगितलेले आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदापेक्षा महाराष्ट्र धर्म आणि संस्कृती तसेच महाराष्ट्र वाचवणे हे कर्तव्य आहे. यासाठी आम्ही सगळे काम करत आहोत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

लवकरच महायुतीत मोठी गडबड शक्य

निवडणुका कधी लागतील, हे सांगता येत नाही. निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयात बसतो. महायुतीमध्ये महाभारत चालले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हात वर केले आहेत. पुढील महिन्यात महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयाच्या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत. या निकालाकडून फार अपेक्षा आहेत, असे नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, लाल किल्ल्यावरून म्हणत होते वन नेशन वन इलेक्शन आणायचं आहे. मात्र देशांमधील चार राज्यातील निवडणुका घ्यायला ते घाबरत आहेत. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती भयावह आहे. कायदा आणि पोलिसांचा धाक राहिला नाही. थोडीशी भावना, थोडीशी तरी माणुसकी असती तर भाजपाने आणि पंतप्रधानांनी जळगाव येथील कार्यक्रम रद्द केला असता. एकीकडे जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि एकीकडे ते उत्साह साजरा करत आहेत. हा कार्यक्रम जनतेच्या पैशाने झाला. शासकीय कार्यक्रम आहे. सर्वांत संवेदनहीन प्रधानमंत्री या देशाने पाहिला आहे, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMahayutiमहायुती