शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

“लवकरच महायुतीत मोठी गडबड शक्य, देवेंद्र फडणवीसांनी हात वर केलेत”; काँग्रेसचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 11:59 IST

Congress Nana Patole News:

Congress Nana Patole News: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यातच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काही सर्व्हेनुसार, लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महाविकास आघाडी बाजी मारण्याचा अंदाज आहे. तर काही कमी फरकाने महायुतीला सत्ता राखण्यात यश येईलच असे नाही, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. यातच लवकरच महायुतीत काही गडबड शक्य आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महायुती संदर्भात हात वरती केलेत, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत एकवाक्यता नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना आवाहन करूनही मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत स्पष्ट भूमिका घेताना कुणी दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी हाच चेहरा राहणार आहे. बैठकीत आम्ही हे जाहीरपणे सांगितलेले आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदापेक्षा महाराष्ट्र धर्म आणि संस्कृती तसेच महाराष्ट्र वाचवणे हे कर्तव्य आहे. यासाठी आम्ही सगळे काम करत आहोत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

लवकरच महायुतीत मोठी गडबड शक्य

निवडणुका कधी लागतील, हे सांगता येत नाही. निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयात बसतो. महायुतीमध्ये महाभारत चालले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हात वर केले आहेत. पुढील महिन्यात महायुतीमध्ये मोठी गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयाच्या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत. या निकालाकडून फार अपेक्षा आहेत, असे नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, लाल किल्ल्यावरून म्हणत होते वन नेशन वन इलेक्शन आणायचं आहे. मात्र देशांमधील चार राज्यातील निवडणुका घ्यायला ते घाबरत आहेत. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती भयावह आहे. कायदा आणि पोलिसांचा धाक राहिला नाही. थोडीशी भावना, थोडीशी तरी माणुसकी असती तर भाजपाने आणि पंतप्रधानांनी जळगाव येथील कार्यक्रम रद्द केला असता. एकीकडे जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि एकीकडे ते उत्साह साजरा करत आहेत. हा कार्यक्रम जनतेच्या पैशाने झाला. शासकीय कार्यक्रम आहे. सर्वांत संवेदनहीन प्रधानमंत्री या देशाने पाहिला आहे, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMahayutiमहायुती