शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीती महायुतीचा दणदणीत विजय;भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 01:14 IST

"देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मग कष्टकरी असेल किंवा शेतकरी असेल, शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, प्रत्येकासाठी ज्या पद्धतीने काम केले, त्यामुळेच हा विजय महायुतीला मिळाला आहे," असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.

राज्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. निवडणुकीचे निकाल येत असताना, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मग कष्टकरी असेल किंवा शेतकरी असेल, शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, प्रत्येकासाठी ज्या पद्धतीने काम केले, त्यामुळेच हा विजय महायुतीला मिळाला आहे," असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. ते मुंबईत माध्यममांसोबत बोलत होते. 

चव्हाण म्हणाले, "आज जिल्हापरिषदेचा निवडणूक निकाल जाहीर झाला. खरेतर, या निवडणुकीच्य मध्यान्नकाळातच महायुतीचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजित दादा यांचे अपघाती निधन झाले आणि आम्हा सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी ही एक धक्कादायक अशी घटना होती. आपण नेहमी बघतो, निवडणूका मोठ्या असोत की छोट्या, कार्यकर्त्यांचा आणि पक्षाच्या विचारधारेचा विजय व्हावा, यासाठी देवेंद्रजी रात्रीचा दिवस करतात. मात्र, अजित दादांच्या घटनेनंतर, त्यांनी आम्हा पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्यांना, या निवडणुकांमध्ये आपण मोठ्या प्रचार सभा घ्यायच्या नाहीत अथवा कोणत्याही मिरवणूकांचा जल्लोष करायचा नाही. कार्यकर्ता बूथवर ज्या पद्धतीने काम करतो, त्याच पद्धतीने आपण सर्वांनी लढायच्या, असे सांगितले होते."

"देवेंद्रजीं, आदरणीय एकनाथराव शिंदे आणि दिवंगत नेते अजित दादा यांच्या नेतृत्वात गेल्या तीन वर्षांमध्ये ज्या ताकदीने काम झाले, त्यामुळे या बारा जिल्हापरिषदांच्या निवडणुकीत, बाराच्या बाराही ठिकाणी महायुतीचेच सत्ता बसेल असे चित्र आहे. एकशे पंचवीस पेक्षा जास्त पंचायत समिती ज्या आहेत, त्यामध्येसुद्धा भारतीय जनता पक्ष पन्नास पेक्षा जास्त ठिकाणी सत्ता स्थापन करेल. या सर्व भागांमध्ये महायुतीचे जवळजवळ ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त लोकप्रतिनिधी निवडून येताना दिसत आहेत. खरंतर हा विजय म्हणजे जनतेने दिलेला कौल आहे. महाराष्ट्रातील सर्व मतदारांचं मी महायुतीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो," असेही रविंद्र चव्हाण यावेली म्हणाले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Grand Victory for Mahayuti in Zilla Parishad Elections: BJP President Speaks

Web Summary : Mahayuti secured a resounding victory in Zilla Parishad and Panchayat Samiti elections due to PM Modi's work. BJP will establish power in most places. The win reflects public trust in Mahayuti's leadership and development initiatives over the past three years.
टॅग्स :Ravindra Chavanरविंद्र चव्हाणZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६panchayat samitiपंचायत समितीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस