शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

"महायुती सरकार पळपुटे, अडचणीत येईल म्हणून अधिवेशन गुंडाळून पळ काढतंय"; विरोधकांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:49 IST

Mill Workers News: गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहण्याचा व्यक्त केला निर्धार

गिरणी कामगारांच्या वतीने आझाद मैदानात आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे आझाद मैदानात उपस्थित राहिले. या मोर्चाला संबोधित करताना जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

"मुंबईत जवळपास ७६ एकर जागा उपलब्ध आहे. मात्र सरकार गिरणी कामगारांना मुंबईतून विस्थापित करून दूर शेलू आणि वांगणीला पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. गिरणी कामगारांना हे मान्य नाही. त्यामुळे त्यांचा गोष्टीला प्रचंड विरोध आहे. सरकार यावर तोडगा काढत तर नाहीच. उलट शेलू, वांगणीला घर नाकारल्यास कामगारांना घरांचा हक्क राहणार नाही असं म्हणत आहेत. त्यामुळे हे पळपुटे सरकार आहे. अडचणीत येईल म्हणून अधिवेशनही गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे," अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सभागृहात आणि सभागृहाबाहेर गिरणी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडेल अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांवर संभ्रमावस्था आहे. त्या लोकांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नांवर कार्यरत असणाऱ्या १४ कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांनी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून लाँग मार्च काढला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या सहयोगाने गृहनिर्माण योजना लागू केली होती. गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणार, असेही जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMaharashtraमहाराष्ट्र