शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Nawab Malik Arrest : नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचे धरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 05:43 IST

Nawab Malik Arrest : राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांसह आघाडीतील नेते, पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरील आंदोलनात सहभागी होत मलिक यांना आपला पाठिंबा दर्शविला.

 मुंबई : अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी धरणे आंदोलन केले. राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांसह आघाडीतील नेते, पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरील आंदोलनात सहभागी होत मलिक यांना आपला पाठिंबा दर्शविला. तसेच केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात घोषणाबाजी करीत संताप व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री राजेश टोपे, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी केंद्र सरकार, ईडी आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘नवाब मलिक जिंदाबाद- ईडी मुर्दाबाद, मोदी सरकार हाय हाय, महाराष्ट्र लढेगा मोदी हारेगा, महाराष्ट्र ना कधी दिल्लीसमोर झुकला ना कधी झुकणार, आवाज कुणाचा महाविकास आघाडीचा; अशा जोरदार घोषणा व फलक फडकावत मविआच्या नेते, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी पुतळा परिसर दणाणून सोडला.

केंद्राच्या दडपशाहीविरोधात आघाडी एकत्र लढा देत असून, भाजपला नवाब मलिक यांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी ही कारवाई झाली आहे. ज्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले त्या केंद्रीय मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलन केले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

तर नवाब मलिक यांच्यावरील कारवाई ही राजकीय सूडबुद्धी आहे. अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण देशात सुरू आहे. मंत्र्याला अशा पद्धतीने अटक करणे लोकशाहीला मारक असून, केवळ संशयाच्या आधारावरील या कारवाईने चुकीचा पायंडा पाडला जात असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

ईडीचा पेपर फुटलाच कसा? - सुप्रिया सुळेईडीची कुठलीही कारवाई होते, तेव्हा महिन्याअगोदरच त्या कारवाईसंबंधीच्या बातम्या बाहेर कशा येतात? दहावीचा एखादा पेपर फुटला की परीक्षा रद्द होते. शिक्षण अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. मग ईडीच्या बातम्या बाहेर पडतात, तेव्हा ईडीचा पेपर फुटल्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न खा. सुप्रिया सुळे यांनी केला. ईडीच्या बातम्या भाजपच्या नेत्यांना कशा मिळतात, याची चौकशी व्हावी, अशी मागणीही केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे सुळे यांनी सांगितले. नवाब मलिक भाजपची पोलखोल करीत आले आहेत. त्यामुळे त्यांना सतत धमक्या मिळत होत्या. मलिक धमक्यांना जुमानत नाही, असे दिसायला लागले तेव्हा त्यांच्यावर खोट्या आरोपांची राळ उठविण्यात आल्याचे सुळे म्हणाल्या.

मलिकांवरील आरोपात तथ्य नाही : जयंत पाटीलकेंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांना टार्गेट करण्याचे काम दोन-अडीच वर्षांपासून सुरू आहे. नवाब मलिक यांच्यावर लावलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही, हे तपशील पाहिल्यावर लक्षात येते. मलिक यांच्यावर याआधी कोणताही गंभीर आरोप झालेला नाही. अशा व्यक्तीवर २०-२५ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या मालमत्तेवर बोट ठेवून ज्याचा संबंध नाही, अशा व्यक्तीला तुरुंगात टाकणे हे योग्य नाही. तसेच या प्रकरणाचे कनेक्शन अतिरेकी संघटनांशी जोडणे, हा प्रकार जनतेच्या लक्षात आला आहे. राज्यभर या अटकेच्या विरोधात प्रतिक्रिया उमटणार आहेत. मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता राष्ट्रवादीला वाटत नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी