शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

"महाविकास आघाडी सरकार अल्पमतात, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा", नारायण राणेंनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 13:38 IST

Rajya Sabha Election Result: राज्यसभा निवडणुकीतील निकाल पाहता महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावले आहे, त्यामुळे Uddhav Thackeray यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी Narayan Rane यांनी केली आहे.

मुंबई - नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाल्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मोठ्या आत्मविश्वासाने संजय पवार यांच्या रूपात दुसरा उमेदवार दिला होता. मात्र पवार यांच्या परावभवामुळे उद्धव ठाकरेंवर मोठी नामुष्की ओढवली आहे. त्यानंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निषाणा साधला आहे. राज्यसभा निवडणुकीतील निकाल पाहता महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावले आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.

नारायण राणे म्हणाले की, राज्यसभा निवडणूक होण्यापूर्वी काहीजण बढाया मारत होते. पण त्यांची नाचक्की झाली आहे. ते स्वत:चे आमदारही वाचवू शकले नाहीत. आतापर्यंतच्या इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली नाही त्या भाषेत उद्धव ठाकरे बोलत होते. फडणवीसांवर टीका करत होते. आम्ही वाघ आहोत, अमुक आहोत. जी भाषा वापरायला नको होती ती वापरली. मी त्या भाषेचा उल्लेख करणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नामुष्की ओढवली आहे. तसेच बेअब्रू झाली. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला हे दुर्दैव समजतो.

राज्यसभा निवडणुकीत तीन जागा जिंकणार, असे शिवसेना सांगत होती. शेवटी काय झालं. संजय राऊत एका मताने निवडून आले. थोडक्यात वाचले आमच्या हातातून.  एकूणच सत्तेत असलेल्या आघाडीची मतं यांना मिळाली पाहिजे होती. पण तेवढी ती मिळाली नाही. उद्धव ठाकरेजी सत्ता राखण्यासाठी १४५ जणांचा पाठिंबा लागतो. तुम्ही अल्पमतात आलेले आहात. तुम्ही राजीनामा द्या.नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या आणि बाजूला व्हा. या महाराष्ट्राला १० वर्षे मागे नेलंत. तसेच सत्ताधारी आणि विरोधक यांचं नातंही तुम्ही धुळीला मिळवलंत. म्हणून तुम्हाला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

तुमचे ८-९ आमदार फुटतात. तुमच्याबाबत विश्वासार्हता राहिलेली नाही. आम्ही विरोधात असूनही आमदारांना एकत्र ठेवलं. मात्र तु्म्हाला ते जमलं नाही. शरद पवारांनी निकालानंतर जी प्रतिक्रिया दिली. त्यातून बोध घ्या. चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे, पण तुमच्याकडून तशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा