शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

‘पुरवणी’ परीक्षेत महाराष्ट्र नापास !

By admin | Updated: March 26, 2015 00:37 IST

तांत्रिक अडचणी : इच्छाशक्तीचा अभाव, अंमलबजावणी शक्य

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही दहावी, बारावीसाठी पुरवणी परीक्षा घेण्यासाठी पाच वर्षांपूर्वी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने सविस्तर अभ्यास केला होता. मात्र, तांत्रिक अडचणी, मनुष्यबळाचा अभाव, आदी कारणांमुळे पुरवणी परीक्षेचा निर्णय होऊन अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र नापास झाले. अलीकडे तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने अशी परीक्षा घेणे शक्य असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षांना महत्त्व आहे. त्यामुळे परीक्षा व निकाल वेळेवर लागावे, अशी विद्यार्थी, पालकांची अपेक्षा असते. निकाल जितका लांबणीवर, तितका अधिक काळ विद्यार्थी मानसिक दडपणाखाली असतो. करिअरची दिशा ठरविण्यासाठी विचार करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. कर्नाटकात महिन्यात निकाल लागल्याने करिअरची दिशा ठरविण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे येथील मंडळाने पुरवणी परीक्षा घेण्यासाठी सविस्तर अभ्यास केला.कर्नाटकात कशा पद्धतीने नियोजन केले जाते, त्याची माहिती घेतली. मात्र, महाराष्ट्रात पुरवणी परीक्षेची यंत्रणा राबविण्यात अडचणी दिसू लागल्या. शासनाच्या शिक्षण विभागानेही विशेष लक्ष दिले नाही. त्यामुळे निर्णय होऊ शकला नाही. मंडळाने दहावीच्या नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेऐवजी दोन विषयांत नापास असला, तरी पुढच्या वर्गात प्रवेश देण्याची मुभा दिली. त्यामध्ये अकरावी किंवा अन्य अभ्यासक्रमांची मुख्य परीक्षा देण्यापूर्वी नापास विषय सोडविणे बंधनकारक केले. यामुळे संबंधित विद्यार्थ्यास नापास असलेल्या दोन विषयांचा आणि पुढील वर्गातील विषयांचा अभ्यास करताना ताण पडतो. म्हणून विद्यार्थ्यांसाठी याचा फारसा फायदा झाला नाही. बारावीत नापास विद्यार्थ्यांसाठी आॅक्टोबरच पर्याय राहिला.अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांचे शिक्षण संस्थांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आहेत. नापास झालेल्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील एक वर्ष वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दबाव वाढविल्यास पुढील शैक्षणिक वर्षात पुरवणी परीक्षेचा निर्णय होणे सहज शक्य आहे. विद्यार्थ्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर भाजप शासनाने तरी दहावी, अकरावी व बारावीसाठी पुरवणी परीक्षा घ्यावी, अशी मागणी आहे. कर्नाटकच्या धर्तीवर पुरवणी परीक्षा महाराष्ट्रात घेण्यासंबंधी मंडळाने पाच वर्षांपूर्वी अभ्यास केला होता. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना प्रश्नपत्रिका विविध भाषेत भाषातंर करणे, परीक्षा घेण्यासाठी यंत्रणा उभा करणे, अशा अडचणी समोर आल्या. त्यामुळे पुरवणी परीक्षेऐवजी दहावीत दोन विषयांत नापास असल्यास पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय झाला.- उज्ज्वला पाटील, माजी अध्यक्षा, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळमहाराष्ट्रातच आठ प्रश्नपत्रिकांचे भाषांतरशिक्षक संघटनांचा वारंवार परीक्षा प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा, शिक्षकांचे संप यामुळे मुख्य परीक्षा वेळेत घेऊन निकाल लावताना मंडळाची दमछाक होते. दहावीसाठी देशात फक्त महाराष्ट्रातच आठ भाषेत प्रश्नपत्रिका भाषांतर केली जाते. एकूण २७३ विषय आहेत. दीर्घोत्तरीय प्रश्न असतात. या महत्त्वाच्या अडचणी आल्याने पुरवणी परीक्षेचा विषय मागे पडला.अकरावीसाठीही पुरवणी परीक्षातेथे अकरावीच्या मुख्य परीक्षेत नापास झाल्यास एका महिन्यात पदव्युत्तर परीक्षा मंडळ पुन्हा पुरवणी परीक्षा घेते. पास झालेल्या विद्यार्थ्यास बारावीला प्रवेश मिळतो. याउलट येथे अकरावीत नापास झाल्यास मध्ये कोणतीही परीक्षा घेतली जात नाही. पुढील वार्षिक परीक्षेलाच पुन्हा बसावे लागते. यामुळे पूर्ण वर्ष वाया जाते. तपासणी मानधनात फरककर्नाटकात दहावीचा एक पेपर तपासण्यासाठी सात, तर बारावीसाठी दहा रुपये दिले जातात. याउलट महाराष्ट्रात दहावीसाठी सव्वाचार व बारावीचे पेपर तपासण्यासाठी पाच रुपये दिले जातात. महाराष्ट्रातील पेपर तपासणीसाठी विलंब होण्याचे हेही एक कारण असू शकते.