शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Winter Session: सत्ताधाऱ्यांकडून सोयीचं राजकारण; अजित पवारांनी घेतला सरकारचा समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 09:57 IST

दिशा सालियान प्रकरण काढण्याची गरज नव्हती. तिच्या आईवडिलांनी केलेले आवाहन वाचलं. राष्ट्रपतींना केलेले निवेदन वाचलं. मुद्दामहून लोकांचे लक्ष विचलित होण्यासाठी असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाचा सुरू आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

नागपूर - हिवाळी अधिवेशनच्या पहिल्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे. गुरुवारी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे आजच्या कामकाजात सभागृहात भाग घ्यायचा की नाही याबाबत विरोधक बैठकीत ठरवतील. परंतु सत्ताधाऱ्यांकडून सोयीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला. 

अजित पवार म्हणाले की, भुजबळ माझगाव मतदारसंघातून आमदार होते, मुंबईचे महापौर राहिले आहे. त्यांनी उदाहरण देताना मुंबईचा उल्लेख सोन्याचं अंड देणारी कोंबडी केला. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. परंतु विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणून काम पाहत होते. त्यांनीही मुंबईला सोन्याच अंड देणारी कोंबडी असा उल्लेख केला होता. इतर भाजपा नेत्यांनीही हा उल्लेख केला होता. मला सभागृहात बोलण्याची संधी मिळाली तर मी कागदे सादर करेन. सभागृहात जयंत पाटील यांनी जे काही वक्तव्य केले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. परंतु सत्तेच्या जोरावर बहुमत वापरून गोंधळ घालायचा. सत्ताधारी-विरोधी पक्ष दोघांनी समन्वयाची भूमिका घेऊन वागलं पाहिजे. सभागृहात महागाई, बेरोजगारी, विदर्भ-मराठवाड्यातील प्रश्नावर चर्चा होण्यासाठी अधिवेशन बोलावलं आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच दिशा सालियान प्रकरण काढण्याची गरज नव्हती. तिच्या आईवडिलांनी केलेले आवाहन वाचलं. राष्ट्रपतींना केलेले निवेदन वाचलं. मुद्दामहून लोकांचे लक्ष विचलित होण्यासाठी असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाचा सुरू आहे. नको त्या प्रश्नांची चर्चा होतेय. महिलांना मानसन्मान देणारे आपण आहोत. जे हयात नाही त्यांच्याबद्दल बोलायचं हे कुठेतरी थांबले पाहिजे. जुन्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न केला जातोय हे अतिशय चुकीचे आहे. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर भाजपा नेत्यांनी किती आरोप केले होते. परंतु ते आता त्यांच्या मंत्रिमंडळात असल्याने सगळं गोमूत्र शिंपडून पवित्र केलंय का? असा सवालही अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला. 

भूखंडाचे प्रकरण भाजपा नेत्यांनीच काढलेसत्ताधारी पक्षातील जे असतात त्यांची चौकशी होत नाही. त्यांना क्लीनचीट दिली जाते. उद्धव ठाकरे सरकार काळात एकनाथ शिंदेंबाबत भूखंडाचं प्रकरण भाजपानेच पुढे आणलं होते. शिंदे गटाने आता भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर ते भूखंड वाटपाच्या प्रकरणातून माघार घेतायेत. हे महाराष्ट्रातील जनतेने पाहावे असंही अजित पवार म्हणाले.  

सीमाप्रश्नावर अद्याप ठराव नाहीमहाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर एकमताने ठराव करू असं कामकाज सल्लागार बैठकीत ठरलं होते. परंतु आठवड्याचा शेवटचा कामकाज आहे. परंतु आजच्या पत्रिकेतही हा विषय नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री हे केवळ त्या राज्याचे आहे. उगीच लोकांना बरे वाटतंय त्यासाठी काहीही विधान करतायेत असं सांगत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.   

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनBJPभाजपा