शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Maharashtra Winter Session: मराठा मोर्चाचा Video ट्विट करणाऱ्या संजय राऊतांना दिला अजित पवारांनी सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 09:56 IST

महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला जातोय त्यावर कुणाला टीका करायची असेल तर करू द्या. आम्ही मोर्चा काढत आमची भूमिका मांडली आहे असंही अजित पवार म्हणाले.

मुंबई -  महाविकास आघाडीच्या हल्लाबोल मोर्चावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केलेत. खासदार संजय राऊतांनी मराठा मोर्चाचा जुना व्हिडिओ ट्विट करत मविआचा हल्लाबोल मोर्चा असल्याचं दाखवलं. त्यावरून सत्ताधारी पक्षाने विरोधकांना कोंडीत पकडले आहे. मविआच्या हल्लाबोल मोर्चातील गर्दीवरून सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे. त्यात आता अजित पवारांनीसंजय राऊतांना सल्ला दिला आहे. 

अजित पवार म्हणाले की, आम्ही कोणी ट्विट केलंय का? कुणाला नॅनो म्हणायचं नॅनो म्हणा, आम्हाला त्याच्याशी देणंघेणं नाही. महाराष्ट्रातील जनतेसाठी हा मोर्चा काढायचा होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे शब्द वापरले जातात ते सातत्याने थांबायला तयार नाही. हे महाराष्ट्राच्या अस्मितेला कुणालाही पटत नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला जातोय त्यावर कुणाला टीका करायची असेल तर करू द्या. आम्ही मोर्चा काढत आमची भूमिका मांडली आहे. संजय राऊतांनी काय ट्विट केले याची माहिती नाही. परंतु कुणीही काम करताना जी वस्तूस्थिती आहे ती लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला आहे. 

सीमावादावर जशास तसं उत्तर दिलं नाही सीमावादाचा प्रश्न कुणी निर्माण केला? हा प्रश्न आत्ताचा नाही तर जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासूनचा आहे. परंतु आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जे विधान केले त्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब उत्तर, जशास तसं द्यायला हवं होतं. परंतु तसं उत्तर महाराष्ट्राकडून दिले गेले नाही. सरकारने दिले नाही. ही वस्तूस्थिती आहे. मराठी भाषिकांवर अन्याय झाला, गाड्यांची तोडफोड झाली. ट्विटरच्या माध्यमातून काही ट्विट करण्यात आले. सुप्रीम कोर्टात प्रकरण असताना हा वाद पुढे यायला नको होता. हरिश साळवींसारखे वकील सीमावादावर देणे अपेक्षित होते. गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली. राज्याच्या मंत्र्यांना बेळगावात जाण्यापासून रोखलं होते. ही हुकूमशाही नाही. केंद्राने लक्ष दिले पाहिजे. दिल्लीतील बैठकीनंतर कर्नाटकचे वेगळे मत येतंय हे बरोबर नाही. महागाई, बेरोजगारी यासारखे इतर विषयही अधिवेशनात चर्चेत येतील असंही अजित पवारांनी सांगितले. 

ज्याची चूक नाही त्याला त्रास होऊ नयेकुणाची चौकशी करायला विरोध नाही. तुम्ही सरकारमध्ये आहात. वेगवेगळ्या यंत्रणाचा वापर कसा चाललाय हे महाराष्ट्र बघतोय. ज्यांची चूक नाही त्यांना त्रास होऊ नये हे पाहिले पाहिजे. लोकायुक्त कायदा महाराष्ट्रात येत असेल त्याचा आनंद आहे. परंतु त्या विधेयकात काय तरतुदी आहेत याचा अभ्यास करावा लागेल. जाणुनबुजून काही कलमं घातली तर अडचणी येऊ शकतात. राज्याच्या हितासाठी कुठलेही विधेयक आणलं तर चर्चा करून ती मंजूर करण्याची भूमिका विरोधी पक्षाची आहे असंही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSanjay Rautसंजय राऊतWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन