शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महाराष्ट्राला मिळणार कणखर विरोधीपक्ष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 13:14 IST

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं सरकार स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर भाजप विरोधीपक्षाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भाजपकडून कणखर विरोधकांची भूमिका पार पाडण्यात येईल, अस चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे. 

मुंबई - प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगल्यानंतर 2014 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याची वेळ आली होती. त्याचवेळी सत्तेत आलेल्या भाजपने निर्माण केलेले वर्चस्व विरोधकांना झाकोळून टाकणारे होते. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने विरोधीपक्षाची राज्यातील स्थिती किती बिकट आहे, हे दिसून आले. यामुळेच राज्यात विरोधी पक्षाची कमतरात जाणवल्याची चर्चा होती. परंतु, आता राज्याला भाजपच्या रुपाने कणखर विरोधीपक्ष मिळणार, असे संकेत मिळत आहे. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करून लढलेल्या भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या आहेत. मात्र 50-50 च्या फॉर्म्युल्यावरून भाजपने भूमिका बदलल्यामुळे शिवसेनेने युतीसोबत सरकार स्थापन करण्यास नकार दिला आहे. तर शिवसेना सोबत येणार नसल्यामुळे भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे.

एकूणच राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं सरकार स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर भाजप विरोधीपक्षाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भाजपकडून कणखर विरोधकांची भूमिका पार पाडण्यात येईल, अस चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे. याउलट शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस शिवआघाडी फिसकटली आणि युती सत्तेत आली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी बळकट विरोधीपक्ष म्हणून उभा राहिल अस दिसत आहे. 

विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपकडून समोर विरोधकच नसल्याचा दावा करण्यात आला होता. राज्यात विरोधीपक्षच नाही, असा दावा राज ठाकरे यांनी केला होता. किंबहुना आपल्याला विरोधीपक्ष होण्यासाठी मतदान करा, असं आवाहन त्यांनी मतदारांना केले होते. मात्र मतदारांना राज ठाकरे यांना विरोधीपक्ष नेतेपद मिळेल एवढे मतदान केले नाही. त्याचवेळी मतदारांनी विरोधीपक्ष कणखर मिळेल याची काळजी घेतल्याचं निकालातून स्पष्ट झाले आहे.