शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

महाराष्ट्राला मिळणार कणखर विरोधीपक्ष !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 13:14 IST

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं सरकार स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर भाजप विरोधीपक्षाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भाजपकडून कणखर विरोधकांची भूमिका पार पाडण्यात येईल, अस चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे. 

मुंबई - प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगल्यानंतर 2014 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याची वेळ आली होती. त्याचवेळी सत्तेत आलेल्या भाजपने निर्माण केलेले वर्चस्व विरोधकांना झाकोळून टाकणारे होते. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने विरोधीपक्षाची राज्यातील स्थिती किती बिकट आहे, हे दिसून आले. यामुळेच राज्यात विरोधी पक्षाची कमतरात जाणवल्याची चर्चा होती. परंतु, आता राज्याला भाजपच्या रुपाने कणखर विरोधीपक्ष मिळणार, असे संकेत मिळत आहे. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करून लढलेल्या भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या आहेत. मात्र 50-50 च्या फॉर्म्युल्यावरून भाजपने भूमिका बदलल्यामुळे शिवसेनेने युतीसोबत सरकार स्थापन करण्यास नकार दिला आहे. तर शिवसेना सोबत येणार नसल्यामुळे भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे.

एकूणच राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं सरकार स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर भाजप विरोधीपक्षाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भाजपकडून कणखर विरोधकांची भूमिका पार पाडण्यात येईल, अस चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे. याउलट शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस शिवआघाडी फिसकटली आणि युती सत्तेत आली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी बळकट विरोधीपक्ष म्हणून उभा राहिल अस दिसत आहे. 

विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपकडून समोर विरोधकच नसल्याचा दावा करण्यात आला होता. राज्यात विरोधीपक्षच नाही, असा दावा राज ठाकरे यांनी केला होता. किंबहुना आपल्याला विरोधीपक्ष होण्यासाठी मतदान करा, असं आवाहन त्यांनी मतदारांना केले होते. मात्र मतदारांना राज ठाकरे यांना विरोधीपक्ष नेतेपद मिळेल एवढे मतदान केले नाही. त्याचवेळी मतदारांनी विरोधीपक्ष कणखर मिळेल याची काळजी घेतल्याचं निकालातून स्पष्ट झाले आहे.