शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 17:55 IST

Maharashtra Assembly Election 2024: गेल्या वेळी २०१९ च्या विधानसभेला ६१.४४ टक्के मतदान झाले होते. मतदानाचा पाच वाजेपर्यंतचा आकडा पाहता २०१९ चा आकडा पार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. आता फक्त तासभरच वेळ उरला असून सहा वाजता मतदान केंद्रांचे गेट बंद केले जाणार आहे. यानंतर आतमध्ये असलेल्या मतदारांचेच मतदान घेतले जाणार आहे. या तासाभरात हा आकडा साठच्या वर जाणार आहे हे नक्की झाले आहे. 

गेल्या वेळी २०१९ च्या विधानसभेला ६१.४४ टक्के मतदान झाले होते. मतदानाचा पाच वाजेपर्यंतचा आकडा पाहता २०१९ चा आकडा पार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झालेच तर जादाचे झालेले हे मतदान कोणाच्या पारड्यात, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात की सत्ताधाऱ्यांच्या बाजुने असेल याचे अंदाज लावले जाणार आहेत. 

गडचिरोली जिल्हा ७० टक्के मतदानाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. तर त्यापाठोपाठ भंडारा ६५.८८ आणि गोंदिया ६५.०९ चा नंबर लागत आहे. हिंगोली जिल्ह्यानेही ६१.१८ चा आकडा गाठला आहे. जालना ६४.१७ टक्के, कोल्हापूर ६७.९७ टक्के, नंदुरबार जिल्हा ६३.७२, परभणी ६२.७३ टक्के, रायगड ६१.०१, सांगली ६३.२८, सातारा ६४ टक्के, सिंधुदुर्ग ६२ टक्के, वर्धा ६३.५०, यवतमाळ ६१.२२ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी असलेल्या जिल्ह्यांत मुंबई, ठाणे आणि पुणेकरांचा समावेश आहे. 

ठाणे ४९.७६, मुंबई शहर ४९.०७, मुंबई ५१.७६, पुणे ५४.०९ या जिल्ह्यांत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे. असे असले तरी बहुतांश मतदारसंघांत चांगले मतदान झाले आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग