शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

भविष्यात महाराष्ट्र बनेल औद्योगिक क्षेत्राचे हब, उद्योगमंत्री उदय सामंत याचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 06:47 IST

भविष्यात महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राचे हब बनेल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी ठाण्यात  केले.

ठाणे : महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यावर रिझर्व्ह बँकेने केलेल्या सर्वेक्षणात एक लाख १३ हजार २३६ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.  त्यामुळे उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र नंबर एकवर गेला आहे. भविष्यात महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राचे हब बनेल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी ठाण्यात  केले.

ठाण्यातील एका संस्थेने आयाेजित केलेल्या बिझनेस जत्रेचे सामंत आणि ठाण्याचे खा. नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बाेलत हाेते. सामंत म्हणाले की, राज्यातील लघुउद्योजकांना ताकद देण्यासाठी अशा उपक्रमाची गरज आहे. उद्योजक निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे. त्यासाठी पहिला उद्योजकांचा मराठी मेळावा नाशिकमध्ये घेतला जाईल.  त्याला उद्योग विभाग आणि मराठी भाषा विभाग पूर्ण सहकार्य करेल,  असेही सामंत यांनी जाहीर केले. ज्या ठिकाणी एमआयडीसी होईल त्या ठिकाणी २० टक्के जागा सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगासाठी राखून ठेवली जाईल, अशी घाेषणा त्यांनी केली.  त्यासाठी आम्ही  भाडे कमी आकारून दहा वर्षांची योजना बनवू.  त्यातून  स्थानिक उद्योजक मोठा होईल, असेही ते म्हणाले.  

टाटा स्कील सेंटर १५० कोटी रुपयांतून गडचिरोलीमध्ये टाटा सीएसआर फंडातून तीन महिन्यांत सुरू केले. रत्नागिरीमध्ये पाच हजार मुलांना शिकवणारे स्कील सेंटर रत्नागिरीमध्ये टाटा सीएसआर फंडातून सुरू झाले. पुणे, कल्याण-डोंबिवलीमध्येही सुरू करत आहोत.  आशिया खंडातील सगळ्यात मोठे उद्योग भवनाला रतन टाटा यांचे नाव देण्याचे ठरवले आहे.  तसेच सगळ्या  स्कील सेंटरला टाटा स्कील सेंटर हे नाव देणार आहे.  

उद्योजकांनी या स्कील सेंटरसोबत टायअप  करण्याचे आवाहनही  त्यांनी केले.  यावेळी पीतांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे अशोक दुगडे आदी उपस्थित हाेते. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतMahayutiमहायुतीShiv Senaशिवसेना