शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

जातीय गट-तट विसरल्यास महाराष्ट्र ‘पाणीदार’ होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 05:19 IST

एकमेकांना अडवून एकमेकांची जिरवल्याने जलसंधारण होणार नाही. यासाठी जातीय गट तट विसरुन पुढे यावे लागेल. तसे झाल्यास महाराष्ट्र पाणीदार होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात अठरा पगड जातीच्या लोकांचा समावेश होता. महाराष्ट्रात इतक्या वर्षांपासून जलसंधारणाचे प्रयत्न होत नाही, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यास हा दोष समाजातील गटा तटात असणाऱ्या हेवेदाव्यात आहे. एकमेकांना अडवून एकमेकांची जिरवल्याने जलसंधारण होणार नाही. यासाठी जातीय गट तट विसरुन पुढे यावे लागेल. तसे झाल्यास महाराष्ट्र पाणीदार होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियममध्ये पाणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, अमृता देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.आमीर खानच्या पाणी फाउंडेशनचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या आतापर्यंतच्या सामाजिक परिस्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले, एकमेकांमधील गट तट जोपर्यंत दूर होणार नाहीत तोपर्यंत जलसंधारणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. पाणीप्रश्नावर जलसंधारण हे उत्तर आहे. मात्र तो प्रश्न केवळ सरकारच्या विश्वासावर सुटणार नाही. यासाठी लोकचळवळ उभी राहण्याची गरज आहे. जनतेकडून वेगवेगळ्या योजना तयार झाल्यास त्यांना हातभार लावण्याचे काम सरकार करेल. पाणी फाउंडेशन यशस्वी होण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यात गावातील नागरिकांचा स्वयंस्फुर्त सहभाग. सामान्यांकडून असामान्य प्रकारचे काम करुन घेण्याचे श्रेय आमीर यांना द्यायला हवे. यापुढील वॉटरकपच्या स्पर्धांमध्ये देखील सर्वपक्षीय सहभाग असेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विजेत्या तीनही गावांना शासनाच्यावतीने प्रोत्साहनपर अनुक्रमे २५ लाख, १५ लाख व १० लाखांचे बक्षीस देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्यमंत्री विजय शिवतारे, अशोक चव्हाण, राज ठाकरे, किरण राव, राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अजित पवार यांची भाषणे झाली.निवडणूकीचा काळ असला तरी स्पर्धा होऊ द्यापुढील वर्षी होणाºया सार्वत्रिक निवडणुकीचा कुठलाही परिणाम वॉटर कप स्पर्धेवर होणार नाही. पाणी हा मुख्य प्रश्न आहे. पाण्याचा अतिउपसा केला तर पुन्हा दुष्काळ येईल. निसर्गाने आपल्याला खूप दिले आपणच आपल्याला दुष्काळाकडे नेले़ पिकांचा पॅटर्न निश्चित करणे आवश्यक आहे. पाण्यासाठी एकच पक्ष असून त्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी आमिर खान यांना केली.स्वप्न पूर्ण करण्यास मदतीचा हातसुरुवातीला शंका होती. मात्र पुढे या स्पर्धेने जलसंधारणात झालेला बदल बघून समाधान वाटले. याकरिता गरजेनुसार जेसीबी देऊन वेळेत ते काम पूर्ण करण्याकरिता मोठ्या मेहनतीने गावकºयांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करता आली. याचा आनंद वाटतो, अशी भावना भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केली.पाण्यावरून सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय जुगलबंदीपुणे : कार्यक्रमाला सर्वच मान्यवर आहेत तेव्हा त्यांची नावे का घ्यायची, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या वाक्याने ‘पानी फाउंडेशन’च्या त्या कार्यक्रमाचे व्यासपीठ राजकीय होणार याची कल्पना उपस्थितांना आली.आता कुठे महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होत असेल तर यापूर्वीचे व सध्याचे असे दोन्ही सत्ताधारी पक्षाचे नेते उपस्थित असून त्यांनी इतक्या वर्षातला इरिगेशनचा पैसा कुठे गेला? याचे उत्तर द्यावे. राज यांच्या या प्रश्नावर टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यावर ‘काही लोकं नुसते बोलघेवडे असतात. त्यांना काही करायचे नसते. केवळ सभा जिंकायची असते.’ या शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज यांना चिमटा काढला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची फिरकी घेतली.राज म्हणाले, गावातल्या लोकांना जागृत करण्याचे काम आमिर खान करत असेल तर सरकार काय करते? जलसंधारणामध्ये जेवढे पाणी मुरले तेवढ्यात राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता. ‘पानी फाउंडेशन’मध्ये सरकारी अधिकारी काम करतात तर, सरकारच्या कामात सरकारी अधिकारी काम का करत नाहीत? आमिर खान कधी कुठला पुरस्कार घेत नाही. मात्र मॅगसेसे पुरस्कार मिळेल तेव्हा तो नक्की घेईल.तुम्ही श्रमदानासाठी कधी येणार असा प्रश्न प्रेक्षकांनी केला असता, श्रमदानासाठी नक्की येईल. सरकारमध्ये नसल्याने मला फावडे कसं चालवायचे हे माहिती नाही, तेवढे नक्की शिकवा, असे ते म्हणाले.आमीर यांना स्वत:वर कुठल्याही राजकीय पक्षाचा शिक्का मारुन घेऊ नका, असा सल्ला पवार यांनी दिला. राज्यातील काही धरणे आज १०० टक्के भरली आहेत. परंतु काही जिल्ह्णात अजूनही पाण्याची गरज आहे. किरण ‘राव’ करेल तेच ‘गाव’ करेल, अशी कोटीही त्यांनी केली.राजकारणाशिवाय समाजसेवा करता येतेराजकीय दिग्गजांच्या उपस्थितीबाबत आमिरखान म्हणाला, मला राजकारणात रस नाही. कुठलेही सामाजिक काम करताना सर्जनशील कल्पना, त्या कल्पनेची प्रभावी अंमलबजावणी, आणि सर्वांचा सहभाग गरजेचा असतो. राष्ट्रउभारणीत रस असून राजकारणाशिवाय समाजसेवा करता येते. आपण सतत सरकारकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे. दुसºयांकडे बोट करण्यापेक्षा प्रत्येकाने आपआपल्या क्षेत्राकडे लक्ष दिल्यास बरेच प्रश्न कमी होतील.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस