शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेसाठी काँग्रेसच्या हालचाली?; 10 अपक्ष संपर्कात असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 16:19 IST

Maharashtra Election Result 2019: मुख्यमंत्र्यांपाठोपाठ काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा दावा

मुंबई: विधानसभेचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 अपक्ष आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 10 अपक्ष संपर्कात असल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  काल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. जनतेनं दिलेला कौल मान्य असल्याचं थोरात म्हणाले. 'अपेक्षित असताना मतदारांनी चांगला कौल दिला. निवडणुकीपूर्वी वर्तवण्यात आलेले सर्व अंदाज चुकले. जनतेचा कौल सत्तेच्या विरोधात आहे. आम्ही पुढील 5 वर्ष लोकांची चांगली सेवा करू,' असं थोरात म्हणाले. राष्ट्रवादीनं निवडणूक प्रचारात चांगला जोर लावला. त्यातुलनेत काँग्रेस कमी पडली का, असा प्रश्न थोरात यांना विचारण्यात आला. त्यावर काँग्रेस पक्ष निवडणुकीत ताकदीनं उतरला होता, असं थोरात म्हणाले. 'काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. अशोक चव्हाणांनी मराठवाड्याकडे लक्ष दिलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. काँग्रेस, राष्ट्रवादीनं जे ठरवलं, ते निभावलं,' असं थोरात यांनी सांगितलं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात