शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

महाराष्ट्र निवडणूक 2019: शरद पवारांच्या 'हिंट'मुळे शिवसेना प्रचंड आशावादी; पण काँग्रेस फेरणार स्वप्नांवर पाणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 12:26 IST

Maharashtra Election Result 2019: शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल सोनिया गांधी फारशा अनुकूल नाहीत

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 11 दिवस उलटूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात नवी समीकरणं दिसू शकतात, असे संकेत शिवसेना, राष्ट्रवादीनं दिले आहेत. मात्र काँग्रेस पक्ष याबद्दल फारसा अनुकूल नसल्याचं समजतं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल द्विधा मनस्थितीत आहेत. राज्याच्या जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला असला तरीही शिवसेना, भाजपाला अद्याप सत्तेच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करता आलेला नाही. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत वारंवार भाजपावर टीका करत आहेत. पुढचा मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचाच होईल, शिवसेनेकडे 175 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणार का याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.राज्याच्या राजकारणात वेगानं घडामोडी सुरू असताना काल शरद पवार यांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. त्यावेळी पवारांनी राज्यातील परिस्थिती सोनिया गांधींना सांगितली. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल सोनिया यांनी फारशी अनुकूलता न दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यास महाराष्ट्रात भाजपा सत्तेपासून दूर होईल. मात्र याचे परिणाम राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला सहन करावे लागतील, अशी भूमिका सोनिया यांनी मांडल्याचं समजतं.तत्पूर्वी 1995च्या फॉर्म्युलाप्रमाणे शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून देण्यात आल्याचं वृत्त आहे. राष्ट्रवादी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करू शकते. या सरकारला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असेल. त्या बदल्यात काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिलं जाईल, असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून देण्यात आल्याचं या नेत्यानं सांगितलं. शिवसेनेनं भाजपासोबतची युती तोडल्यावरच याप्रकारे सत्ता स्थापन होईल, असंदेखील हा नेता पुढे म्हणाला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवार