शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

महाराष्ट्र निवडणूक 2019: संजय राऊत यांनी 'औकात' काढली; शिवसेना, भाजपामधील तणाव वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 09:01 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेचे शाब्दिक बाण; वाढणार महायुतीतला ताण?

मुंबई: विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. राज्याच्या जनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं असूनही शिवसेना, भाजपाला सत्ता स्थापन करण्यात यश आलेलं नाही. शिवसेना मुख्यमंत्रिपदासह सर्वच सत्तापदांची समान वाटणी व्हावी, यावर ठाम आहे. तर भाजपा मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक आवश्यक आहे. मात्र दोन्ही पक्षांमधील संवाद जवळपास संपुष्टात आला आहे. याउलट एकेमकांवर केल्या जाणाऱ्या टीकेमुळे तणाव वाढला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत वारंवार भाजपाला लक्ष्य करत आहेत. काल रात्री एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाजपावर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधलं. 'दोस्ती उन्हीं से बनाओ जो निभाने की औकात रखते हो,' असं राऊत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच राऊत यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंचा फोटोदेखील शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राऊत 'सामना'सोबतच पत्रकार परिषदांमधून भाजपावर जोरदार टीका करत आहेत. सत्ता वाटपावरून महायुतीत संघर्ष सुरू असताना आज संध्याकाळी शिवसेनेचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत शिवसेनेचे नेते राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती राज्यपालांना देतील. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला आमंत्रित करावं, अशी मागणी यावेळी शिवसेनेकडून करण्यात येईल. भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्यानं त्यांनी 145 आमदारांचा पाठिंबा मिळवावा आणि सरकार स्थापन करावं, असं संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. शिवसेनेकडे 175 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत केला.राज्यातील सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं आज महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत पोहोचले आहेत. ते आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? या मुद्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. पवार यांनी काल दूरध्वनीवरून सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली आहे. सोनिया गांधी यांनी या संदर्भात पक्षातील नेत्यांच्या मतापेक्षा शरद पवार यांच्या मताला अधिक महत्त्व किंवा विश्वासार्ह मानत असल्याचं समजतं.राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक मदतीची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत जात आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून अधिक आणि तातडीची मदत मिळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेतील. राज्यातील सत्तास्थापनेच्या संदर्भात देखील ते शहा यांच्याशी चर्चा करतील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना