शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, भाजपाकडून दबावाचं राजकारण; राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीगाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 11:42 IST

रावतेंनी घेतली राज्यपालांची भेट; मुख्यमंत्री थोड्याच वेळात राजभवनला पोहोचणार

मुंबई: शिवसेना आणि भाजपानं सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्याचं दिसत आहे. मात्र यातूनही दोन्ही पक्षांनी दबावाचं राजकारण सुरू ठेवलं आहे. शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. शिवसेना, भाजपाचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर महायुतीतले दोन्ही मोठे पक्ष राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीगाठी घेत एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे सत्तेचं समान वाटप व्हावं, यावर शिवसेना ठाम आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना, भाजपामध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचले. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुंबईचा महापौर असल्यापासून आपण दिवाळीच्या दुसऱ्या देण्यासाठी राज्यपालांची भेट घेत असल्याचं रावते यावेळी म्हणाले. थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीचा अजेंडा निश्चित नाही. मात्र या बैठकीत सरकार स्थापनेबद्दल चर्चा होणार असल्याची माहिती भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिली. 'मुख्यमंत्री राज्यपालांना सध्याच्या राजकीय स्थितीची माहिती देऊन सरकार स्थापनेबद्दल चर्चा करतील,' असं या नेत्यानं सांगितलं. शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्तेच्या समान वाटपाची भूमिका मांडत भाजपानं याबद्दल लिखित आश्वासन द्यावं अशी मागणी केली. शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावं, यावर उद्धव ठाकरे ठाम आहेत. विधानसभा निवडणुकीत 164 जागा लढवणाऱ्या भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवण्याचा विश्वास होता. मात्र प्रत्यक्षात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या 17 जागा कमी झाल्या. त्यामुळे आता सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला शिवसेनेची आवश्यकता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा