शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

Vidhan Sabha 2019: मतदारनोंदणीची प्रक्रिया ४ ऑक्टोबरपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:47 IST

राज्यातील मतदारनोंदणीची प्रक्रिया निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत म्हणजे ४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

मुंबई : राज्यातील मतदारनोंदणीची प्रक्रिया निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत म्हणजे ४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी नोंदणी करणाऱ्यांना निवडणुकीत मतदान करता येईल, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज पत्रपरिषदेत सांगितले.आचारसंहिता भंगाची प्रकरणे रोखण्यासाठी सी-व्हिजील अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. आचारसंहिता भंग होत असल्याचे दिसून आल्यास दक्ष नागरिक त्याचे छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून त्याची तक्रार नोंदवू शकतात, असेही बलदेवसिंह यांनी सांगितले.२०११च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांच्या मागे ९२५ महिला असे प्रमाण होते. तर २०१४ मध्ये एक हजार पुरुषांच्या मागे ८८९ महिला असे प्रमाण होते. आता २०१९मध्ये महिलांच्या संख्येत वाढ झाली असून एक हजार पुरुषांच्या मागे ९१४ असे प्रमाण आहे. दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा म्हणून यंदा सुलभ निवडणुका हे घोषवाक्य जाहीर केले आहे. दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर आणली आहेत.टोल फ्री क्रमांकमतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी व तक्रारींसाठी १९५० हा चोवीस तास कार्यरत टोल फ्री क्रमांक आहे. ३१ आॅगस्टपर्यंत महाराष्ट्रात ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदार आहेत. २०१४ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये ५९ लाख १७ हजार ९०१ इतकी वाढ झाली आहे. २०१४ साली ९०.४३ टक्के मतदारांकडे व्होटर आयडी होते. हे प्रमाण २०१९ मध्ये ९६.८१ टक्के इतके झाले.सर्व विधानसभा मतदारसघांमध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅटचा वापर संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच होणार आहे. निवडणुकीसाठी ६ लाख ५० हजार कर्मचारी नियुक्त केले आहेत.बँकेच्या व्यवहारांवर लक्षनिवडणुकीच्या काळात बेकायदा मद्याची वाहतूक व विक्री व मतदारांना इतर प्रलोभने दाखवली जाणार नाही याकडे लक्ष ठेवण्यात येईल. त्याशिवाय इन्कम टँक्स, एक्साईज विभागाची दक्षता पथके नेमण्यात आली आहेत. त्याशिवाय बँकांमधून होणा-या मोठ्या रक्कमांच्या व्यवहारावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019