शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

Vidhan Sabha 2019: मतदारनोंदणीची प्रक्रिया ४ ऑक्टोबरपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:47 IST

राज्यातील मतदारनोंदणीची प्रक्रिया निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत म्हणजे ४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

मुंबई : राज्यातील मतदारनोंदणीची प्रक्रिया निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत म्हणजे ४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी नोंदणी करणाऱ्यांना निवडणुकीत मतदान करता येईल, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज पत्रपरिषदेत सांगितले.आचारसंहिता भंगाची प्रकरणे रोखण्यासाठी सी-व्हिजील अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. आचारसंहिता भंग होत असल्याचे दिसून आल्यास दक्ष नागरिक त्याचे छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून त्याची तक्रार नोंदवू शकतात, असेही बलदेवसिंह यांनी सांगितले.२०११च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांच्या मागे ९२५ महिला असे प्रमाण होते. तर २०१४ मध्ये एक हजार पुरुषांच्या मागे ८८९ महिला असे प्रमाण होते. आता २०१९मध्ये महिलांच्या संख्येत वाढ झाली असून एक हजार पुरुषांच्या मागे ९१४ असे प्रमाण आहे. दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा म्हणून यंदा सुलभ निवडणुका हे घोषवाक्य जाहीर केले आहे. दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर आणली आहेत.टोल फ्री क्रमांकमतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी व तक्रारींसाठी १९५० हा चोवीस तास कार्यरत टोल फ्री क्रमांक आहे. ३१ आॅगस्टपर्यंत महाराष्ट्रात ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदार आहेत. २०१४ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये ५९ लाख १७ हजार ९०१ इतकी वाढ झाली आहे. २०१४ साली ९०.४३ टक्के मतदारांकडे व्होटर आयडी होते. हे प्रमाण २०१९ मध्ये ९६.८१ टक्के इतके झाले.सर्व विधानसभा मतदारसघांमध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅटचा वापर संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच होणार आहे. निवडणुकीसाठी ६ लाख ५० हजार कर्मचारी नियुक्त केले आहेत.बँकेच्या व्यवहारांवर लक्षनिवडणुकीच्या काळात बेकायदा मद्याची वाहतूक व विक्री व मतदारांना इतर प्रलोभने दाखवली जाणार नाही याकडे लक्ष ठेवण्यात येईल. त्याशिवाय इन्कम टँक्स, एक्साईज विभागाची दक्षता पथके नेमण्यात आली आहेत. त्याशिवाय बँकांमधून होणा-या मोठ्या रक्कमांच्या व्यवहारावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019