शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

Vidhan Sabha 2019: मतदारनोंदणीची प्रक्रिया ४ ऑक्टोबरपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:47 IST

राज्यातील मतदारनोंदणीची प्रक्रिया निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत म्हणजे ४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

मुंबई : राज्यातील मतदारनोंदणीची प्रक्रिया निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत म्हणजे ४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी नोंदणी करणाऱ्यांना निवडणुकीत मतदान करता येईल, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी आज पत्रपरिषदेत सांगितले.आचारसंहिता भंगाची प्रकरणे रोखण्यासाठी सी-व्हिजील अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. आचारसंहिता भंग होत असल्याचे दिसून आल्यास दक्ष नागरिक त्याचे छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून त्याची तक्रार नोंदवू शकतात, असेही बलदेवसिंह यांनी सांगितले.२०११च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांच्या मागे ९२५ महिला असे प्रमाण होते. तर २०१४ मध्ये एक हजार पुरुषांच्या मागे ८८९ महिला असे प्रमाण होते. आता २०१९मध्ये महिलांच्या संख्येत वाढ झाली असून एक हजार पुरुषांच्या मागे ९१४ असे प्रमाण आहे. दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा म्हणून यंदा सुलभ निवडणुका हे घोषवाक्य जाहीर केले आहे. दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर आणली आहेत.टोल फ्री क्रमांकमतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी व तक्रारींसाठी १९५० हा चोवीस तास कार्यरत टोल फ्री क्रमांक आहे. ३१ आॅगस्टपर्यंत महाराष्ट्रात ८ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ मतदार आहेत. २०१४ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये ५९ लाख १७ हजार ९०१ इतकी वाढ झाली आहे. २०१४ साली ९०.४३ टक्के मतदारांकडे व्होटर आयडी होते. हे प्रमाण २०१९ मध्ये ९६.८१ टक्के इतके झाले.सर्व विधानसभा मतदारसघांमध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅटचा वापर संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच होणार आहे. निवडणुकीसाठी ६ लाख ५० हजार कर्मचारी नियुक्त केले आहेत.बँकेच्या व्यवहारांवर लक्षनिवडणुकीच्या काळात बेकायदा मद्याची वाहतूक व विक्री व मतदारांना इतर प्रलोभने दाखवली जाणार नाही याकडे लक्ष ठेवण्यात येईल. त्याशिवाय इन्कम टँक्स, एक्साईज विभागाची दक्षता पथके नेमण्यात आली आहेत. त्याशिवाय बँकांमधून होणा-या मोठ्या रक्कमांच्या व्यवहारावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019