शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
6
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
7
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
8
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
9
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
10
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
11
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
12
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
13
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
14
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
15
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
16
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
17
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
18
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
19
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Vidhan Sabha 2019: आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात?; काय सांगतो भाजपाचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 13:05 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - 2012 मध्ये पुन्हा एकदा एमजीपी आणि भाजपा एकत्र आली. मात्र तोपर्यंत भाजपाने राज्यात आपले पाय रोवले होते. भाजपाने 28 जागांवर निवडणूक लढविली तर एमजीपीला फक्त 7 जागांवर निवडणूक लढवावी लागली.

मुंबई - महाराष्ट्रात काही दिवसांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. सगळेच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे प्रत्येकी 125 जागा लढविण्यावर एकमत झालं असून इतर जागा मित्रपक्षांना देण्याचं ठरलं आहे. तर दुसरीकडे आमचं ठरलंय म्हणणाऱ्या शिवसेना-भाजपा युतीचे घोडं अद्याप अडलं आहे. विधानसभा निवडणुकीत 50-50 फॉर्म्युलावर शिवसेना ठाम आहे तर भाजपा 120 जागांपेक्षा अधिक जागा शिवसेनेला सोडण्यास तयार नाही. 

1989 मध्ये राम मंदिरासाठी देशभरात हिंदू लोकांची एकजूट झाल्याचं पाहायला मिळाल्यानंतर शिवसेना-भाजपाने पहिल्यांदा युती केली. तेव्हापासून 2014 पर्यंत शिवसेनेने नेहमी भाजपापेक्षा अधिक जागांवर निवडणुका लढविल्या आहेत. राज्यात 2014 पर्यंत युतीमध्ये शिवसेना मोठ्या भावाची भूमिका घेत होती. मात्र 2014 निवडणूक भाजपा-शिवसेनेने वेगवेगळ्या लढल्या. या निवडणुकीत शिवसेनेपेक्षा दुप्पट जागा भाजपाच्या निवडून आल्या.

शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं अस्तित्व जवळपास संपुष्टात आलं आहे. जर सध्याच्या वातावरणात भाजपाच्या धमकीला घाबरत जर युतीत शिवसेनेने कमी जागा लढविल्या तर निवडणुकीनंतर भाजपा शिवसेनेला टार्गेट करु शकते. त्यावेळी राज्यात विरोधी पक्ष कमकुवत झालेला असेल. शिवसेनेसाठी गोव्याच्या महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे मोठं उदाहरण आहे. 

भाजपाने गोव्यात ज्यापद्धतीने महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाची अवस्था केली तशी अवस्था उद्या महाराष्ट्रात शिवसेनेची होऊ शकते. गोव्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचा वापर करुन राज्यभरात भाजपाने आपले पाय रोवले. तशारितीने महाराष्ट्रात शिवसेनेची मदत घेऊन भाजपाने आपला गड निर्माण केला आहे. 

शिवसेना-भाजपाने लढविल्या विधानसभेच्या जागा 

  • 1990 मध्ये शिवसेनेने 183 तर भाजपाने 105 जागा लढविल्या होत्या. 
  • 1995 मध्ये शिवसेनेने 183 तर भाजपाने 105 जागा लढविल्या होत्या.
  • 1999 मध्ये शिवसेनेने 161 तर भाजपाने 117 जागा लढविल्या होत्या.
  • 2004 मध्ये शिवसेनेने 163 तर भाजपाने 111 जागा लढविल्या होत्या.
  • 2009 मध्ये शिवसेनेने 160 तर भाजपाने 109 जागा लढविल्या होत्या.

 

शिवसेनेसाठी मोठा धडागोव्यामध्ये 1961 मध्ये पोर्तुगाल राजवट संपल्यानंतर राज्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी पहिली सत्ताधारी पार्टी होती. 1963 ते 1979 पर्यंत एमजीपीने गोव्यात राज्य केलं. 1994 मध्ये पहिल्यांदा एमजीपीने आणि भाजपासोबत आघाडी करुन निवडणुका लढविल्या. एमजीपीने 25 जागा आणि भाजपाने 12 जागांवर निवडणूक लढविली. ही आघाडी त्याचवर्षी संपुष्टात आली मात्र यानिमित्ताने भाजपाला एमजीपीच्या मतांमध्ये फूट पाडण्याची संधी मिळाली. 

2012 मध्ये पुन्हा एकदा एमजीपी आणि भाजपा एकत्र आली. मात्र तोपर्यंत भाजपाने राज्यात आपले पाय रोवले होते. भाजपाने 28 जागांवर निवडणूक लढविली तर एमजीपीला फक्त 7 जागांवर निवडणूक लढवावी लागली. एमजीपीचे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने भाजपात सहभागी झाले. याचवर्षी मार्च महिन्यात एमजीपीच्या 3 पैकी 2 आमदारांनी आपला गट भाजपात विलीन केला. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना कमकुवत करून भाजपा मजबूत करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारणgoaगोवा