शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

Vidhan Sabha 2019: आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात?; काय सांगतो भाजपाचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 13:05 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - 2012 मध्ये पुन्हा एकदा एमजीपी आणि भाजपा एकत्र आली. मात्र तोपर्यंत भाजपाने राज्यात आपले पाय रोवले होते. भाजपाने 28 जागांवर निवडणूक लढविली तर एमजीपीला फक्त 7 जागांवर निवडणूक लढवावी लागली.

मुंबई - महाराष्ट्रात काही दिवसांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. सगळेच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे प्रत्येकी 125 जागा लढविण्यावर एकमत झालं असून इतर जागा मित्रपक्षांना देण्याचं ठरलं आहे. तर दुसरीकडे आमचं ठरलंय म्हणणाऱ्या शिवसेना-भाजपा युतीचे घोडं अद्याप अडलं आहे. विधानसभा निवडणुकीत 50-50 फॉर्म्युलावर शिवसेना ठाम आहे तर भाजपा 120 जागांपेक्षा अधिक जागा शिवसेनेला सोडण्यास तयार नाही. 

1989 मध्ये राम मंदिरासाठी देशभरात हिंदू लोकांची एकजूट झाल्याचं पाहायला मिळाल्यानंतर शिवसेना-भाजपाने पहिल्यांदा युती केली. तेव्हापासून 2014 पर्यंत शिवसेनेने नेहमी भाजपापेक्षा अधिक जागांवर निवडणुका लढविल्या आहेत. राज्यात 2014 पर्यंत युतीमध्ये शिवसेना मोठ्या भावाची भूमिका घेत होती. मात्र 2014 निवडणूक भाजपा-शिवसेनेने वेगवेगळ्या लढल्या. या निवडणुकीत शिवसेनेपेक्षा दुप्पट जागा भाजपाच्या निवडून आल्या.

शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं अस्तित्व जवळपास संपुष्टात आलं आहे. जर सध्याच्या वातावरणात भाजपाच्या धमकीला घाबरत जर युतीत शिवसेनेने कमी जागा लढविल्या तर निवडणुकीनंतर भाजपा शिवसेनेला टार्गेट करु शकते. त्यावेळी राज्यात विरोधी पक्ष कमकुवत झालेला असेल. शिवसेनेसाठी गोव्याच्या महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे मोठं उदाहरण आहे. 

भाजपाने गोव्यात ज्यापद्धतीने महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाची अवस्था केली तशी अवस्था उद्या महाराष्ट्रात शिवसेनेची होऊ शकते. गोव्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचा वापर करुन राज्यभरात भाजपाने आपले पाय रोवले. तशारितीने महाराष्ट्रात शिवसेनेची मदत घेऊन भाजपाने आपला गड निर्माण केला आहे. 

शिवसेना-भाजपाने लढविल्या विधानसभेच्या जागा 

  • 1990 मध्ये शिवसेनेने 183 तर भाजपाने 105 जागा लढविल्या होत्या. 
  • 1995 मध्ये शिवसेनेने 183 तर भाजपाने 105 जागा लढविल्या होत्या.
  • 1999 मध्ये शिवसेनेने 161 तर भाजपाने 117 जागा लढविल्या होत्या.
  • 2004 मध्ये शिवसेनेने 163 तर भाजपाने 111 जागा लढविल्या होत्या.
  • 2009 मध्ये शिवसेनेने 160 तर भाजपाने 109 जागा लढविल्या होत्या.

 

शिवसेनेसाठी मोठा धडागोव्यामध्ये 1961 मध्ये पोर्तुगाल राजवट संपल्यानंतर राज्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी पहिली सत्ताधारी पार्टी होती. 1963 ते 1979 पर्यंत एमजीपीने गोव्यात राज्य केलं. 1994 मध्ये पहिल्यांदा एमजीपीने आणि भाजपासोबत आघाडी करुन निवडणुका लढविल्या. एमजीपीने 25 जागा आणि भाजपाने 12 जागांवर निवडणूक लढविली. ही आघाडी त्याचवर्षी संपुष्टात आली मात्र यानिमित्ताने भाजपाला एमजीपीच्या मतांमध्ये फूट पाडण्याची संधी मिळाली. 

2012 मध्ये पुन्हा एकदा एमजीपी आणि भाजपा एकत्र आली. मात्र तोपर्यंत भाजपाने राज्यात आपले पाय रोवले होते. भाजपाने 28 जागांवर निवडणूक लढविली तर एमजीपीला फक्त 7 जागांवर निवडणूक लढवावी लागली. एमजीपीचे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येने भाजपात सहभागी झाले. याचवर्षी मार्च महिन्यात एमजीपीच्या 3 पैकी 2 आमदारांनी आपला गट भाजपात विलीन केला. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना कमकुवत करून भाजपा मजबूत करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारणgoaगोवा