शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
3
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
4
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
5
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
6
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
7
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
8
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
9
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
10
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
11
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
12
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
13
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
14
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
15
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
16
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
18
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
19
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
20
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: युती होणार की पुन्हा एकदा अफझलखान, औकात निघणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 07:04 IST

श्रीयुत अमितभाई शहा यांची भूमिका खणखणीत असते. त्यातून अनेक मार्ग मोकळे होतात. ज्याचा त्याचा मार्ग स्वीकारायलासुद्धा सोपे जाते. मुं

- वसंत भोसलेश्रीयुत अमितभाई शहा यांची भूमिका खणखणीत असते. त्यातून अनेक मार्ग मोकळे होतात. ज्याचा त्याचा मार्ग स्वीकारायलासुद्धा सोपे जाते. मुंबईत ते निवडणुका जाहीर होताच आले. भाजप-शिवसेना युतीची घाई झालेल्या माध्यमांनी आता अखेरचा हात फिरवून ते प्रचाराचा नारळ वाढविणार, अशा थाटात बातम्या दिल्या. मात्र, त्यांनी चौतीस मिनिटांच्या आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केला ना, तसा संदेश दिला. याउलट पुन्हा एक बार ‘देवेंद्र’च हे ठासून सांगून टाकले. त्यासाठी शिवसेनेचा टेकू असेल याची शक्यताही भिरकावून देत भाजप बहुमताने सत्तेवर येईल. फिर एक बार मोदी, तसे पुन्हा एकदा ‘देवेंद्र’च हे सांगून टाकले. तेव्हा पोटात भीतीचा गोळा आला. आता अफझलखानाची कबर शोधली जाणार का? दिल्लीचे तख्त मराठी माणसाला समजते काय? वगैरे म्हणत सेना भवनातून तोफगोळे सोडले जाणार का?वास्तविक सासूच नको म्हणून संसार मोडून स्वतंत्र निवडणुकांच्या चुली मांडून पाहिल्या. मराठी माणसांनी काही एका घराची निवड केली नाही. पुन्हा घरोबा करावाच लागला. पहिल्यांदा विरोधी पक्षनेतेपद घेऊन वाटाघाटी करीत दुय्यम वागणूक स्वीकारत एकत्र नांदायचेही ठरले. तसे नांदलेही. संसार पाच वर्षे चालला. तो आम्ही किती उत्तम केला, हे सांगत महाराष्ट्रभर फिरताना मात्र वेगवेगळ्या चुली घेऊन हिंडू लागले. महाजनादेश आम्हालाच हवा, त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही, असेच सांगत सुटले. दोन्ही पक्षांचे संयुक्त सरकार होते तर यश-अपयशही दोघांचेच होते. लोकसभेच्या निवडणुकीत देखील एकत्र संसार असल्याचे सांगण्यात आले. आता अमितभाईंनी मात्र वेगळाच सूर लावला आहे. तसे झाले तर या सूराला सूराने नाही तर आरडाओरडा करून गोंधळ घातला जाऊ शकतो.शिवरायांच्या इतिहासाचे दाखले दिले जाऊ शकतात आणि वेगवेगळ्या उपमांनी महाराष्ट्राची निवडणूकच ऐतिहासिक वळणावर नेऊन ठेवली जाऊ शकते. सूर्याजी पिसाळ ते अफझलखानाच्या कबरीपर्यंत हा प्रचार पोहोचू शकतो. असे असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरता का? असा सवाल उपस्थित होतो. कोणत्या प्रश्नांवर वेगळी भूमिका आहे? की, मोठ्या भावाला आता छोटा करून टाकला आहे. मोठा भाऊ हा कायमचाच मोठा असतो; पण त्यांच्या समोरच आता आम्ही मोठे झालो आहोत, असे सांगण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात आले आहे. मोठ्या भावाला दादा म्हणतात. मग, दादा लहान कसा काय होतो? तो कायमच मोठा असतो.भाजपने संधी साधली आहे. २०१४ मध्ये बहुमताची संधी अधुरी राहिली. काठावर रोखली गेली. आता का सोडा? असा सवालही त्यांच्या मनात असणार आहे. त्यामुळेच शिवसेनेने छोट्या राजपुत्राला महाराष्ट्रात फिरायला सांगितले असावे. पराभव झालाच तर तो लहान राजपुत्राचा (भावाचा) मानायला जागा राखून ठेवली आहे. याचा फैसला तरी करावा लागेल. अन्यथा, शिवाजी कोण आणि अफझलखान कोण? हे तरी महाराष्ट्राला ऐकावे लागेल. त्याची मानसिक तयारी आता मतदारांना करावीच लागेल, असे दिसते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस