शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

Vidhan Sabha 2019 : जिकडे तिकडे व्हॅकन्सी मोरूची चुकली फ्रिक्वेंसी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 04:31 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - थंडगार पाण्याचा तांब्या डोक्यावर ओतताच मोरूच्या अंगातून शिराशिरी बाहेर पडली.

- सुधीर महाजनथंडगार पाण्याचा तांब्या डोक्यावर ओतताच मोरूच्या अंगातून शिराशिरी बाहेर पडली. आपल्या ईडा-पिंगळा जागृत झाल्याचे हे लक्षण समजून त्याच्यात अन्तर्बाह्य उत्साहाचा लोट उसळून आला. भडाभडा पाणी अंगावर ओतून तो ओल्या कपड्यानिशी देवघरात पाटावर येऊन बसला. उदबत्ती पेटवताच धूम्रवल्यासह सुगंधाने वातावरण व्यापले आणि मोरूने नासिकाग्रावर नजर स्थिर करीत डोळे मिटले. सभोवताली प्रचंड शांतता सुस्त होऊन पडली होती. पहाटेचे पावणेचार वाजलेले. घरातही सगळेच साखरझोपेत त्यामुळे मोरूची चाहूल कोणाला येणे शक्यच नव्हते.तासाभराने दुधाची रिक्षा दुकानासमोर थांबल्याचा नित्याचा आवाज आला रस्त्याने छोट्या वाहनांची, फिरायला जाणाऱ्यांची तुरळक वाहतूक सुरू झाली. सहाच्या ठोक्याला नमाजच्या आवाजाने आसमंत व्यापले. ते सरते न सरते तोच मंदिरात भीमसेनांचा रियाज सुरू झाला. पाठोपाठ बुद्धवंदनेने उरलेल्यांना जागे केले. मोरूची बायको बालीला जाग आली. पलंगावर मोरू नसल्याचे तिच्या लक्षात आले; पण असेल घरात किंवा अधून मधून येणारा ‘मॉर्निंग वॉक’चा ‘अटॅक’ आला असावा, असे समजून ती स्वयंपाकघराकडे वळली तो पर्यंत रस्त्यावरची वर्दळ वाढली होती. मोरू त्राटक लावून बसलेलाच; पण मन एकाग्र होत नव्हते. दोन तास उलटूनही त्याला काही गवसत नव्हते. हळूहळू तो अस्वस्थ झाला आकलुजच्या ‘शिवरत्न’ बंगल्यातून निघालेल्या ध्वनिलहरींनी अख्खा महाराष्ट्र व्यापला होता. या ध्वनी कंपनांनी लोणीतला राधाकृष्ण विखेच्या वाड्याला वेढा दिला, अकोल्यात पिचडांच्या बंगल्याचा अँटिना काबीज केला. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर आणि बापूसाहेब गोरठेकरांनाही कवेत घेतले. नंदुरबारमध्ये भरत गावितांच्या ‘सुमाणिक’ बंगल्याला वेटोळा घातला. उस्मानाबादेत राणांच्या गढीला कवेत घेत या लहरी साताºयात छत्रपतींच्या जलमहालातून निघून थेट शिवेंद्रच्या ‘सुरुचि’पर्यंत पोहोचल्या. धनंजय महाडिकांच्या वास्तूला स्पर्श करीत फलटणच्या राजवाड्यावर धडका मारू लागल्या, अशा ‘नेटवर्कने’ ध्वनिलहरींनी महाराष्ट्र काबीज केला.या लहरी नेमक्या काय होत्या हे मोरूला कळत, उमजत नव्हते. उलगडा होत नव्हता. परवा तो भगवा सदरा घालून कलानगरात गेला त्यावेळी भास्कर जाधवांच्या सोबतच्या लोंढ्यात तो सरळ ‘मातोश्री’तच आपसूक पोहोचला. तिथले मंतरलेले वातावरण पाहून भारावून गेला आणि आतून काहीतरी उचंबळून येत आहे, धडका मारत आहेत याची जाणीव त्याला झाली. मंत्रवत त्याने हात पुढे करताच त्याच्याही हातावर शिवबंधन बांधले गेले आणि अंगात वीज संचारल्याचा भास झाला. तशा भारावलेल्या अवस्थेत तो घरी पोहोचला; पण मनाला स्वस्थता नव्हती. काही तरी आहे पण ते सापडत नाही. अशी लंबक अवस्था झाली होती. मध्यरात्रीनंतर अंथरुणात तळमळत असताना भास्कर जाधवांचा खोलवर दडलेला आवाज त्याच्या कानावर आला. ‘अंतरात्म्याचा आवाज’ असे काही शब्द होते. मोरू लगेच उठला आणि त्राटक लावून कानात प्राण आणून बसला; पण अंतरात्म्याचा आवाज येत नव्हता. महाराष्ट्राच्या घराघरातला आवाज आपल्याला ऐकू येत नाही म्हणून त्याची बेचैनी वाढत होती. तिकडे घरात मोरूच्या बापाने रेडिओ लावला; पण बातम्यांचा आवाज नीट येत नव्हता. स्वयंपाकघरातून चहाचा कप आणत बाली म्हणाली बाबा फ्रिक्वेंसी अ‍ॅडजस्ट करा. अन् मोरू ताडकन उठला आणि बाहेर पळाला फ्रिक्वेंसीच्या शोधात.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Madhukar Pichadमधुकर पिचडRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील