शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

Vidhan Sabha 2019 : नेत्यांची अन् मतांची गळती कशी रोखणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 04:34 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या महागळतीमुळे आघाडीला २०१४ मध्ये मिळालेले पावणेदोन कोटी मतांचे गाठोडे टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असणार

- धनंजय वाखारेनाशिक : भाजप-शिवसेनेला रोखण्यासाठी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या महागळतीमुळे आघाडीला २०१४ मध्ये मिळालेले पावणेदोन कोटी मतांचे गाठोडे टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. गेल्या निवडणुकीत कॉँग्रेस व राष्टÑवादीने स्वतंत्रपणे लढताना दोन्ही मिळून १ कोटी ८६ लाख मते घेतली होती, तर भाजप-शिवसेनेनेही स्वतंत्र लढत २ कोेटी ४९ लाखांहून अधिक मते मिळविली होती.२०१४ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली तसेच कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीही दुभंगली होती. हे चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी भाजपने २६० जागा लढविताना १ कोटी ४७ लाख ९ हजार २७६ मते घेतली होती. भाजपच्या मतांची टक्केवारी २७.८१ टक्के इतकी सर्वाधिक राहिली. त्याखालोखाल शिवसेनेने २८२ जागा लढताना १ कोटी २ लाख ३५ हजार ९७० मते मिळविली होती. सेनेची मतांची टक्केवारी १९.३५ टक्के इतकी होती. कॉँग्रेसने २८७ जागांवर उमेदवार उभे केले होते. कॉँग्रेसने ९४ लाख ९६ हजार ९५ मते घेतली. त्यांच्या मतांची टक्केवारी १७.९५ इतकी होती, तर राष्टÑवादीने २७८ जागा लढताना ९१ लाख २२ हजार २८५ मते घेतली. राष्टÑवादीची मतांची टक्केवारी १७.२४ टक्के इतकी नोंदविली गेली होती. सेना-भाजपला एकूण २ कोटी ४९ लाख ४५ हजार २४६ मते मिळाली होती, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीला १ कोटी ८६ लाख १८ हजार ५८० मते मिळाली होती.मागील निवडणुकीत उधळलेला सेना-भाजपचा वारू रोखण्यासाठी यंदा कॉँग्रेस-राष्टÑवादीने चंग बांधला असला तरी गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पक्षांतून प्रमुख नेते-पदाधिकाऱ्यांची सुरू असलेली महागळती रोखण्यात त्यांना अपयश आले आहे. एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये युतीची चर्चा सुरू असतानाच कॉँग्रेस-राष्टÑवादीने मात्र आघाडी करीत प्रत्येकी १२५ जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत. आघाडीमुळे गेल्यावेळी मिळालेला जनाधार टिकवून ठेवण्याचे आव्हान समोर असतानाच मोठ्या प्रमाणावर झालेल्या आउटगोइंगमुळे मतांची गळती होणार नाही, याची काळजी आता आघाडीला वाहावी लागणार आहे.>पवार कुणाकडे बघणार?महागळतीमध्ये राष्टÑवादी सर्वाधिक डॅमेज झालेली आहे. त्यामुळे शरद पवारांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. अशातच शरद पवार यांनी सोलापूरमध्ये बोलताना मला आता काही लोकांकडे बघायचे आहे, असे सांगत पक्ष सोडणाऱ्यांना एकप्रकारे गर्भीत इशाराच दिला आहे. पवार यांच्या एकूणच राजकारणाची हातोटी पाहता पवार यांच्याकडून नेमके कुणाचे हिशेब चुकते होणार, याची उत्सुकता आता आख्ख्या महाराष्टÑाला लागली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार