शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

Vidhan Sabha 2019 : नेत्यांची अन् मतांची गळती कशी रोखणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 04:34 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या महागळतीमुळे आघाडीला २०१४ मध्ये मिळालेले पावणेदोन कोटी मतांचे गाठोडे टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असणार

- धनंजय वाखारेनाशिक : भाजप-शिवसेनेला रोखण्यासाठी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या महागळतीमुळे आघाडीला २०१४ मध्ये मिळालेले पावणेदोन कोटी मतांचे गाठोडे टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. गेल्या निवडणुकीत कॉँग्रेस व राष्टÑवादीने स्वतंत्रपणे लढताना दोन्ही मिळून १ कोटी ८६ लाख मते घेतली होती, तर भाजप-शिवसेनेनेही स्वतंत्र लढत २ कोेटी ४९ लाखांहून अधिक मते मिळविली होती.२०१४ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली तसेच कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीही दुभंगली होती. हे चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी भाजपने २६० जागा लढविताना १ कोटी ४७ लाख ९ हजार २७६ मते घेतली होती. भाजपच्या मतांची टक्केवारी २७.८१ टक्के इतकी सर्वाधिक राहिली. त्याखालोखाल शिवसेनेने २८२ जागा लढताना १ कोटी २ लाख ३५ हजार ९७० मते मिळविली होती. सेनेची मतांची टक्केवारी १९.३५ टक्के इतकी होती. कॉँग्रेसने २८७ जागांवर उमेदवार उभे केले होते. कॉँग्रेसने ९४ लाख ९६ हजार ९५ मते घेतली. त्यांच्या मतांची टक्केवारी १७.९५ इतकी होती, तर राष्टÑवादीने २७८ जागा लढताना ९१ लाख २२ हजार २८५ मते घेतली. राष्टÑवादीची मतांची टक्केवारी १७.२४ टक्के इतकी नोंदविली गेली होती. सेना-भाजपला एकूण २ कोटी ४९ लाख ४५ हजार २४६ मते मिळाली होती, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीला १ कोटी ८६ लाख १८ हजार ५८० मते मिळाली होती.मागील निवडणुकीत उधळलेला सेना-भाजपचा वारू रोखण्यासाठी यंदा कॉँग्रेस-राष्टÑवादीने चंग बांधला असला तरी गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पक्षांतून प्रमुख नेते-पदाधिकाऱ्यांची सुरू असलेली महागळती रोखण्यात त्यांना अपयश आले आहे. एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये युतीची चर्चा सुरू असतानाच कॉँग्रेस-राष्टÑवादीने मात्र आघाडी करीत प्रत्येकी १२५ जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत. आघाडीमुळे गेल्यावेळी मिळालेला जनाधार टिकवून ठेवण्याचे आव्हान समोर असतानाच मोठ्या प्रमाणावर झालेल्या आउटगोइंगमुळे मतांची गळती होणार नाही, याची काळजी आता आघाडीला वाहावी लागणार आहे.>पवार कुणाकडे बघणार?महागळतीमध्ये राष्टÑवादी सर्वाधिक डॅमेज झालेली आहे. त्यामुळे शरद पवारांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. अशातच शरद पवार यांनी सोलापूरमध्ये बोलताना मला आता काही लोकांकडे बघायचे आहे, असे सांगत पक्ष सोडणाऱ्यांना एकप्रकारे गर्भीत इशाराच दिला आहे. पवार यांच्या एकूणच राजकारणाची हातोटी पाहता पवार यांच्याकडून नेमके कुणाचे हिशेब चुकते होणार, याची उत्सुकता आता आख्ख्या महाराष्टÑाला लागली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार