शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

Vidhan Sabha 2019 : नेत्यांची अन् मतांची गळती कशी रोखणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 04:34 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या महागळतीमुळे आघाडीला २०१४ मध्ये मिळालेले पावणेदोन कोटी मतांचे गाठोडे टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असणार

- धनंजय वाखारेनाशिक : भाजप-शिवसेनेला रोखण्यासाठी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या महागळतीमुळे आघाडीला २०१४ मध्ये मिळालेले पावणेदोन कोटी मतांचे गाठोडे टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. गेल्या निवडणुकीत कॉँग्रेस व राष्टÑवादीने स्वतंत्रपणे लढताना दोन्ही मिळून १ कोटी ८६ लाख मते घेतली होती, तर भाजप-शिवसेनेनेही स्वतंत्र लढत २ कोेटी ४९ लाखांहून अधिक मते मिळविली होती.२०१४ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली तसेच कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीही दुभंगली होती. हे चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी भाजपने २६० जागा लढविताना १ कोटी ४७ लाख ९ हजार २७६ मते घेतली होती. भाजपच्या मतांची टक्केवारी २७.८१ टक्के इतकी सर्वाधिक राहिली. त्याखालोखाल शिवसेनेने २८२ जागा लढताना १ कोटी २ लाख ३५ हजार ९७० मते मिळविली होती. सेनेची मतांची टक्केवारी १९.३५ टक्के इतकी होती. कॉँग्रेसने २८७ जागांवर उमेदवार उभे केले होते. कॉँग्रेसने ९४ लाख ९६ हजार ९५ मते घेतली. त्यांच्या मतांची टक्केवारी १७.९५ इतकी होती, तर राष्टÑवादीने २७८ जागा लढताना ९१ लाख २२ हजार २८५ मते घेतली. राष्टÑवादीची मतांची टक्केवारी १७.२४ टक्के इतकी नोंदविली गेली होती. सेना-भाजपला एकूण २ कोटी ४९ लाख ४५ हजार २४६ मते मिळाली होती, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीला १ कोटी ८६ लाख १८ हजार ५८० मते मिळाली होती.मागील निवडणुकीत उधळलेला सेना-भाजपचा वारू रोखण्यासाठी यंदा कॉँग्रेस-राष्टÑवादीने चंग बांधला असला तरी गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पक्षांतून प्रमुख नेते-पदाधिकाऱ्यांची सुरू असलेली महागळती रोखण्यात त्यांना अपयश आले आहे. एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये युतीची चर्चा सुरू असतानाच कॉँग्रेस-राष्टÑवादीने मात्र आघाडी करीत प्रत्येकी १२५ जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत. आघाडीमुळे गेल्यावेळी मिळालेला जनाधार टिकवून ठेवण्याचे आव्हान समोर असतानाच मोठ्या प्रमाणावर झालेल्या आउटगोइंगमुळे मतांची गळती होणार नाही, याची काळजी आता आघाडीला वाहावी लागणार आहे.>पवार कुणाकडे बघणार?महागळतीमध्ये राष्टÑवादी सर्वाधिक डॅमेज झालेली आहे. त्यामुळे शरद पवारांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. अशातच शरद पवार यांनी सोलापूरमध्ये बोलताना मला आता काही लोकांकडे बघायचे आहे, असे सांगत पक्ष सोडणाऱ्यांना एकप्रकारे गर्भीत इशाराच दिला आहे. पवार यांच्या एकूणच राजकारणाची हातोटी पाहता पवार यांच्याकडून नेमके कुणाचे हिशेब चुकते होणार, याची उत्सुकता आता आख्ख्या महाराष्टÑाला लागली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार