शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्यात किती निर्णायक कामे केली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 06:07 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - आदित्य ठाकरे बेरोजगारमुक्त महाराष्ट्र करायचा म्हणतात. मग पाच वर्षे तुमच्या मंत्र्यांनी काय केले?

कर्जत : आदित्य ठाकरे बेरोजगारमुक्त महाराष्ट्र करायचा म्हणतात. मग पाच वर्षे तुमच्या मंत्र्यांनी काय केले? उद्योग व पर्यावरण मंत्री तुमचेच होते ना? पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्यात निर्णायक पंधरा कामे केली असतील ती त्यांनी दाखवावीत’ असे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.कर्जतमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या अंतिम टप्प्यानिमित्त शेळके बंधू कार्यालयाच्या सभागृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.‘मी पुन्हा येणार म्हणजेच मला मुख्यमंत्री करा असे म्हणत जनादेश यात्रा काढून फिरणारे राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच आपण पहात आहोत. पाच वर्षे काम केले असते तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती. बेरोजगारी, शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर या समस्या आहेतच. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल विचारले की, भारत माता की जय म्हणत यात्रा उरकायची. महाराष्ट्रात पाच वर्षांत काय चाललंय हे सर्वांना माहीत आहे. तरीही जनतेला गृहीत धरले जाते, हे दुर्दैव आहे. पाच वर्षांत ९८३ कारखाने बंद झालेत तर १ लाख ४२ हजार उद्योगधंदे बंद झालेत त्यामुळे अनेक लोक बेरोजगार झालेत, असेही कोल्हे म्हणाले.एक जनादेश यात्रा एक जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. एक म्हणतात मी परत येणार तर दुसरे म्हणतात मी फक्त आशीर्वाद घ्यायला आलोय आणि मागून म्हणतात यांना मुख्यमंत्री करा म्हणजे या स्वार्थाची यात्रा आहे. आमची यात्रा कुणाला मुख्यमंत्री करा हे सांगायला नाही तर शिवस्वराज्य आणण्यासाठी आहे. रयतेचे राज्य आणण्यासाठी आहे. सरकार भाजपचे, शिवसेनेचे की युतीचे आहे हे समजत नाही. चांगलं काम झालं की भाजपवाले म्हणतात आमचं सरकार, वाईट काम झालं की शिवसेना म्हणते भाजपचे सरकार आणि फायदा घ्यायचा असला की म्हणतात आमचे युतीचे सरकार. हे म्हणजे तुम्हाला वेडे बनविण्याचे काम सुरू आहे, असे कोल्हे म्हणाले. लोकसभेत सेनेच्या अगर कोणत्याच खासदाराने छत्रपती शिवरायांचे नाव घेतले नाही. मात्र मी ‘जय शिवराय’ म्हणून महाराष्ट्राची अस्मिता जागी ठेवल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले.>प्रास्ताविकात दत्ता मसुरकर यांनी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील कर्जत आणि श्रीवर्धन विधानसभेच्या जागा आपल्याला लढवायच्या आहेत. उर्वरित ठिकाणी मित्रपक्ष उमेदवार उभे करणार आहे, असे स्पष्ट केले.आमदार सुरेश लाड म्हणाले, गेल्यावेळी यांनी सांगितलं आमचं सरकार आलं तर पेण अर्बन बँक शंभर दिवसात सुरू करू, पाच वर्षे झाली काय झालं? मी विरोधी पक्षाचा असल्याने जाणीवपूर्वक कामे रखडविली जातात. या वेळी त्यांना योग्य धडा शिकविण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा आह.तटकरे यांनी माझा मतदारसंघ हा नसला तरी माझ्या मतदारसंघापेक्षा काकणभर प्रेम या कर्जत मतदारसंघावर आहे. कर्जत - खोपोली लोहमार्गाचे दुहेरीकरण, कर्जत - पनवेल लोकलसेवा होण्यासाठी मी लोकसभेत पाठपुरावा करीन. कोंढाणे धरण झाले पाहिजे आणि तेही कर्जतकरांसाठी, असे स्पष्ट केले.अमोल मेटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आदित्य ठाकरे, रामदास आठवले यांच्या आवाजाची नक्कल करीत युती सरकारवर घणाघात केला. आमची पार्टी एनसीपी म्हणजे ‘न्यू कँडीडेट पार्टी’ आहे. या वेळी जनताजनार्दन चांगला विचार करून मतदान करील, असे सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेस