शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

Vidhan Sabha 2019: ३० टक्के आमदारांची कामगिरी खराब, तरी १० आमदारांचंच तिकीट कापणार

By यदू जोशी | Updated: September 23, 2019 11:12 IST

भाजपची रणनीती; बहुतेक आमदारांना पुन्हा संधी

- यदु जोशीमुंबई : राज्यातील भाजपच्या ३० टक्के आमदारांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे रिपोर्ट कार्ड काही महिन्यांपूर्वी त्यांच्या हातात देण्यात आले होते. असे असले तरी प्रत्यक्षात १० ते १२ विद्यमान आमदारांचे तिकिट कापले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.२०१४ मध्ये भाजपचे १२२ आमदार निवडून आले होते. त्यातील अनिल गोटे आणि आशिष देशमुख यांनी आधीच आमदारकीचा आणि भाजपचा राजीनामा दिला आहे. आमदार असलेले गिरीष बापट, उन्मेष पाटील हे खासदार झाले. त्यामुळे आता भाजपचे ११८ आमदार आहेत. यापैकी १० ते १२ आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असल्याचे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. याचा अर्थ १०८ आमदारांना पुन्हा संधी दिली जाईल. हा आकडा कोणत्याही परिस्थितीत १०० च्या खाली असणार नाही, असेही सांगण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांपूर्वी आमदारांच्या हातात रिपोर्ट कार्ड दिले होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या तसेच पक्षसंघटनेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे ते रिपोर्ट कार्ड तयार केले होते. आमदारांची कामगिरी, राज्य व केंद्र सरकारच्या योजनांची त्यांच्या मतदारसंघात कितपत प्रभावी अंमलबजावणी झाली आहे, लोकांची नाराजी कोणत्या मुद्यांवर आहे, लोकांची पसंती कोणत्या मुद्यांवर आहे असे सगळे त्या रिपोर्ट कार्डमध्ये होते. या शिवाय, कोणत्या स्पर्धकांकडून आमदारांना मोठे आव्हान भविष्यात मिळू शकते याचाही उल्लेख होता.मुख्यमंत्र्यांनीच रिपोर्ट कार्ड हाती दिल्याने ज्यांची कामगिरी असमाधानकारक होती त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली होती. भाजप किमान २५ ते ३० विद्यमान आमदारांना घरी बसविणार अशा बातम्याही आल्या होत्या. मात्र, आता हा आकडा कमीतकमी असेल, असे समजते. कामगिरीसोबत इतरही निकष लावण्यात आल्याने काही जण बचावणार आहेत. त्यात जातीय समीकरणे, भाजप-शिवसेनेची युती होणे, रा. स्व. संघाच्या यंत्रणेकडून मिळालेला ‘फीडबँक’, सहा महिन्यांत आमदारांनी कामगिरीत केलेली कमालीची सुधारणा, संभाव्य विरोधी उमेदवारांमध्ये झालेले बदल अशा सगळ््या मुद्यांचा विचारही करण्यात आला.लोकसभा निवडणुकीत सेनेला फटकालोकसभा निवडणुकीत शिवसेनेने जुन्याच चेहऱ्यांना पसंती दिली. त्याचा फटकाही शिवसेनेला बसला आणि आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यासारखे दिग्गज पराभूत झाले होते. भाजपने विद्यमान खासदारांपैकी काहींना घरी पाठविण्याचे धाडस दाखविले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपकडून फारसे आमदार घरी पाठविले जाणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा