शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Vidhan Parishad Election: सतेज पाटलांनी फडणवीसांची चाल चलाखीने पलटवली; काँग्रेस-भाजपा नेते 'आमनेसामने'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 14:39 IST

Maharashtra Vidhan Parishad Election: विधान भवनात चाललेय काय? मतदानाची मुदत संपण्यासाठी दोन तास शिल्लक राहिले आहेत. बावनकुळे अजित पवारांना भेटण्यास गेलेले असताना बाहेर फडणवीस आणि काँग्रेस नेते भेटले.

विधान परिषद मतदानाची वेळ संपत आलेली असताना विधान भवनात जे काही चाललेय त्याची आतही आणि बाहेरही जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपाचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात जात भेट घेतली. तेव्हा तिथे राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे देखील उपस्थित होते. नेमक्या याचवेळी बाहेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आणि काँग्रेसच्या तीन नेत्यांची भेट झाली. 

फडणवीस त्यांच्या आमदारांसह सदनाबाहेर पडले होते, तेवढ्यात समोरून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, बंटी पाटील हे येत होते. फडणवीसांसोबत भाजपाचे उमेदवार प्रशांत बंब, प्रवीण दरेकर देखील होते. यामुळे लगेचच फडणवीसांनी हात जोडत मतदान करायला तीन मतदार येणार आहेत म्हणे असे म्हटले. यावर एकच हशा पिकला. 

यावर सतेज पाटलांनी लगेचच फडणवीसांना प्रत्यूत्तर देत बाजु सावरली. मी नाही येणार, असे म्हटले. त्यावर फडणवीसांनी पाटलांच्या दंडावर हात ठेवून अरे हा नाही येणार, असे म्हटले. विधान भवनात निवडणुकीवरून तणावाचे वातावरण असले तरी शिवसेना वगळता सर्व पक्षांत खेळीमेळीचे वातावरण असल्याचे दिसले. 

मतदानाची मुदत संपण्यासाठी दोन तास शिल्लक राहिले आहेत. दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्यास देण्यासाठी सुनावणी सुरु आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस