शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

महाराष्ट्राचे 'फायर ब्रँड' राज ठाकरे 'फ्लॉवर' झाले का?; रुपाली ठोंबरेंचा बोचरा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 17:38 IST

महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, त्यावर राज ठाकरेंनी चकार शब्दही काढला नाही : रुपाली ठोंबरे

"दरवर्षी पाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा होते. परंतु यापूर्वी ती कोरोनामुळे झाली नाही. राज ठाकरे महाराष्ट्राचे फायर ब्रँड आहे. परंतु शनिवारच्या सभेत भाजपनं जी सुडबुद्धीची कारवाई केली तिथं कुठेतरी हे फायब्रँड पुष्पासारखे फ्लॉवर झाले का? असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात येतो," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलं. शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुढीपाडव्यानिमित्त सभा पार पडली. या सभेदरम्यान त्यांनी अनेकांवर जोरदार निशाणा साधला.

"राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातीयवाद नाहीच. या पक्षात सर्व जातीची, पंथाची, धर्माची लोकं पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मंत्रीदेखील आहेत. अशा पक्षात जातीयवाद असूच कसा शकतो. जातीयवाद असताच तर विशिष्ट समाजाची लोक त्यात असायला हवी होती. परंतु तसं नाही. त्या वक्तव्याला काही अर्थ नाही," रुपाली पाटील म्हणाल्या. ज्या सुडबुद्धीनं भाजपनं ईडी लावली त्याला न घाबरता उभे राहणारे शरद पवार हे देशातील एकमेव नेते आहेत. शरद पवार पाठीशी ठामपणे उभे राहिल्यानं महाविकास आघाडीच्या लोकांच्या मागे हा ससेमिरा लावल्यानंतरही ते घाबरत नसल्याचंही त्या म्हणाल्या."महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, त्यावर राज ठाकरेंनी चकार शब्दही काढला नाही. सार्वजनिक ठिकाणचे भोंगे काढण्याचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाचा होता. परंतु हा त्यांनी राबवला नाही. त्यांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. भाजपकडे विकासाचा एकही मुद्दा राहिलेला नाही. म्हणून जातीपातीचे प्रयोग करण्याचं काम ते करत आहे. त्यांना कोणीही गंभीरपणे घेत नाही. म्हणून इतर पक्षाच्या लोकांना ईडीची धमकी द्यायची, कारवाया करायच्या आणि आपल्याकडे बोलतं करायचं असा प्रयोग सुरू आहे. महाराष्ट्रातील जनताही याला भूलणार नाही," असंही रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस