शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 12:46 IST

"प्रत्येक गोष्टींचे काही फायदे तोटे असतात. फायदा म्हटले तर हे लोकांना आवडते, म्हणूनच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो."

मुंबई - काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे त्यांच्या शांत स्वभावासाठी परिचित आहेत. त्यांनी नुकतीच लोकमतला औपचारीक आणि राजकारणा पलीकडे जाऊन मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांवर दिलखुलासपणे भाष्य केले आणि अनेक किस्सेही सांगितले. यावेळी आपल्या या शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला आहे का? असा प्रश्न केला असता, त्यांनी यावर अगदी मनमोकळेपणाने भाष्य केले. अशा स्वभावामुळेच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो, असे ते म्हणाले. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी त्यांची ही मुलाखत घेतली. (Maharashtra Revenue Minister Balasaheb Thorat talk about their  cool nature and political life)

आपल्या शांत स्वभावासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, "प्रत्येक गोष्टींचे काही फायदे तोटे असतात. फायदा म्हटले तर हे लोकांना आवडते, म्हणूनच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो. यासाठी माझा शांत स्वभावही कारणीभूत असेल, कारण मी कुणाला, फारसा दुखावण्याचा प्रयत्न कधी केलेला नाही. पण याचा तोटाही जास्त आहे याचा, कधी अशांतही झाले पाहिजे. ते होत नसावा हा तोटा आहे माझा. त्यामुळे तोटाही कधी होत असेल. कधी कधी लवकर गरम होणारे जे असतात, त्यांच्यासाठीही काही फायदे असतात काही तोटे असता. प्रत्येक स्वभावाचे काही फायदे काही तोटे आहेत."

...म्हणून शरद पवारांसोबत गेलो नाही! बाळासाहेब थोरातांनी सांगितला त्यांच्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट

यावेळी त्यांनी आपल्या शालेय शिक्षणापासून, उच्च शिक्षणापासून ते आपण राजकारण कस कसे आलो, यावरही भाष्य केले. बाळासाहे थोरातांनी वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर वकीलीही सुरू केली होती. यासंदर्भात आपल्याला पहिल्या वकिलीची फीस किती मिळाली? असे विचारले असता, थोरात म्हणाले, "मी जेव्हा वकिली करायचो, तेव्हा माझे वडील कारखान्याचे चेअरमन होते आणि आमदारही होते. त्यावेळी असे व्हायचे की, ज्या लोकांची कामे तहसील कचेरीत गुंतलेली असायची, एमएसईबीमध्ये गुंतलेली असतील, त्या लोकांनी त्यांना शोधण्याऐवजी मलाच शोधायला सुरुवात केली. काही केसेस मी चालवल्या, ते १० रुपयांसारखे खर्चायला पैसे द्यायचे, मी पाचशे हजार रुपयांपर्यंतही गेलो होतो. पण मी आमदार होण्यामागे वकिलीही एक कारण आहे. नंतर अनेक चळवळींमुळे राजकारणात आलो आणि वकिली सुटली," असे थोरात म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसinterviewमुलाखत