शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 12:46 IST

"प्रत्येक गोष्टींचे काही फायदे तोटे असतात. फायदा म्हटले तर हे लोकांना आवडते, म्हणूनच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो."

मुंबई - काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे त्यांच्या शांत स्वभावासाठी परिचित आहेत. त्यांनी नुकतीच लोकमतला औपचारीक आणि राजकारणा पलीकडे जाऊन मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांवर दिलखुलासपणे भाष्य केले आणि अनेक किस्सेही सांगितले. यावेळी आपल्या या शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला आहे का? असा प्रश्न केला असता, त्यांनी यावर अगदी मनमोकळेपणाने भाष्य केले. अशा स्वभावामुळेच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो, असे ते म्हणाले. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी त्यांची ही मुलाखत घेतली. (Maharashtra Revenue Minister Balasaheb Thorat talk about their  cool nature and political life)

आपल्या शांत स्वभावासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, "प्रत्येक गोष्टींचे काही फायदे तोटे असतात. फायदा म्हटले तर हे लोकांना आवडते, म्हणूनच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो. यासाठी माझा शांत स्वभावही कारणीभूत असेल, कारण मी कुणाला, फारसा दुखावण्याचा प्रयत्न कधी केलेला नाही. पण याचा तोटाही जास्त आहे याचा, कधी अशांतही झाले पाहिजे. ते होत नसावा हा तोटा आहे माझा. त्यामुळे तोटाही कधी होत असेल. कधी कधी लवकर गरम होणारे जे असतात, त्यांच्यासाठीही काही फायदे असतात काही तोटे असता. प्रत्येक स्वभावाचे काही फायदे काही तोटे आहेत."

...म्हणून शरद पवारांसोबत गेलो नाही! बाळासाहेब थोरातांनी सांगितला त्यांच्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट

यावेळी त्यांनी आपल्या शालेय शिक्षणापासून, उच्च शिक्षणापासून ते आपण राजकारण कस कसे आलो, यावरही भाष्य केले. बाळासाहे थोरातांनी वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर वकीलीही सुरू केली होती. यासंदर्भात आपल्याला पहिल्या वकिलीची फीस किती मिळाली? असे विचारले असता, थोरात म्हणाले, "मी जेव्हा वकिली करायचो, तेव्हा माझे वडील कारखान्याचे चेअरमन होते आणि आमदारही होते. त्यावेळी असे व्हायचे की, ज्या लोकांची कामे तहसील कचेरीत गुंतलेली असायची, एमएसईबीमध्ये गुंतलेली असतील, त्या लोकांनी त्यांना शोधण्याऐवजी मलाच शोधायला सुरुवात केली. काही केसेस मी चालवल्या, ते १० रुपयांसारखे खर्चायला पैसे द्यायचे, मी पाचशे हजार रुपयांपर्यंतही गेलो होतो. पण मी आमदार होण्यामागे वकिलीही एक कारण आहे. नंतर अनेक चळवळींमुळे राजकारणात आलो आणि वकिली सुटली," असे थोरात म्हणाले.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसinterviewमुलाखत