शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: राज्यात दिवसभरात १४ हजार ७३२ जण कोरोनामुक्त; २८ जिल्हे, मनपा क्षेत्रात एकही मृत्यू नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 21:59 IST

Coronavirus: राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.५५ टक्क्यांवर गेला आहे.

ठळक मुद्देराज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५५ टक्क्यांवरया जिल्हे, मनपा क्षेत्रात एकही मृत्यू नाही मुंबईत रुग्णदुपटीचा कालाावधी ६७२ दिवसांवर

मुंबई: राज्यातील जनतेसाठी मोठे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १४ हजार ७३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.५५ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ८ हजार १२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 8129 new corona cases and 200 deaths in last 24 hours) 

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत ०८ हजार १२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत २०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १४ हजार ७३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ५४ हजार ००३ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.९ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख ४७ हजार ३५४ इतकी आहे.

मुंबईकरांना मोठा दिलासा

गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या २० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ५२९ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ७२५ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत १९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार २०२ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे १५ हजार ५५० उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.१० टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ६७२ दिवसांवर गेला आहे. 

या जिल्हे, मनपा क्षेत्रात एकही मृत्यू नाही 

सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील २८ जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. ठाणे जिल्हा, ठाणे शहर, उल्हासनगर शहर, भिवंडी शहर, पालघर, वसई-विरार शहर, मालेगाव शहर, अहमदनगर शहर, धुळे शहर, धुळे जिल्हा, जळगाव शहर, पिंपरी चिंचवड शहर, सोलापूर शहर, जालना जिल्हा, परभणी शहर, लातूर शहर, लातूर जिल्हा, नांदेड शहर, अमरावती शहर, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, बुलडाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा या क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

दिलासा! धारावीत शून्य रुग्णांची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ८२ लाख १५ हजार ४९२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५९ लाख १७ हजार १२१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ९ लाख ४९ हजार २५१ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ५ हजार ९९७ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या