शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

CoronaVirus: राज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले; पण, ‘या’ भागांत एकही मृत्यू नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 21:32 IST

CoronaVirus: गेल्या दोन दिवसांपेक्षा राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देराज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले‘या’ भागांत एकही मृत्यू नाही मुंबईकरांच्या चिंतेतही किंचित भर

मुंबई: राज्यातील जनतेसाठी चिंतेत किंचित भर घालणारे वृत्त आहे. गेल्या दोन दिवसांपेक्षा राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. तसेच कोरोना मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत २३ हजार ०६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२.७६ टक्क्यांवर गेला आहे. तसेच गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण २४ हजार ७५२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 24 752 new corona cases and 453 deaths in last 24 hours) 

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत २४ हजार ७५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ४५३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच २३ हजार ०६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५२ लाख ४१ हजार ८३३ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.६२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण ३ लाख १५ हजार ०४२ आहे.

लस खरेदीची पंचवार्षिक योजना राबवणार आहात का; गुजरात हायकोर्टाने सरकारला सुनावले

मुंबईकरांच्या चिंतेतही किंचित भर

गेल्या सलग ७ दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ३६२ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत १ हजार ०२१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ३४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १४ हजार ७४२ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २७ हजार ९४३ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.१९ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ३४८ दिवसांवर गेला आहे. 

‘या’ भागांत एकही मृत्यू नाही 

गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा, धुळे जिल्हा, लातूर शहर, परभणी शहर, उल्हासनगर शहर, भिवंडी शहर, मीरा भायंदर शहर, कल्याण डोंबिवली शहर, ठाणे शहर, औरंगाबाद शहर, जळगाव शहर, धुळे शहर या ठिकाणी कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही. तर नवी मुंबई, वसई विरार, मालेगाव, अमरावती शहर परिसरात आणि औरंगाबाद, पालघर, चंद्रपूर जिल्ह्यात एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. 

‘कोरोनिल’ला विरोध करणाऱ्यांनी पतंजलीमध्ये यावे, आम्ही प्रमाण देऊ: आचार्य बालकृष्ण

दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ३८ लाख २४ हजार ९५९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५६ लाख ५० हजार ९०७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात २३ लाख ७० हजार ३२६ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, १९ हजार ९४३ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबई