शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

CoronaVirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्के; तर दिवसभरात ३४ हजार ३७० जण कोरोनामुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 21:25 IST

CoronaVirus: नव्या कोरोनाबाधितांची संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्दे राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्केदिवसभरात ३४ हजार ३७० जण कोरोनामुक्तमुंबईकरांनाही दिलासादायक वृत्त

मुंबई: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत तब्बल ३४ हजार ३७० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९३.०२ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण २१ हजार २७३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 21 273 new corona cases and 425 deaths in last 24 hours) 

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत २१ हजार २७३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ४२५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३४ हजार ३७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५२ लाख ७६ हजार २०३ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.६३ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण ३ लाख ०१ हजार ०४१ आहे.

Google कडून ७ कोटींचे बक्षीस मिळवण्याची संधी; केवळ ‘हे’ काम करा अन् मालामाल व्हा

मुंबईकरांनाही दिलासादायक वृत्त

गेल्या सलग ८ दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार २६६ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ८५५ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ३६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १४ हजार ७७८ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २८ हजार ३१० उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.१९ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ३५१ दिवसांवर गेला आहे. 

नवे नियम सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठीच, युझर्सनी घाबरू नये: रविशंकर प्रसाद

‘या’ भागांत एकही मृत्यू नाही 

गेल्या २४ तासांत चंद्रपूर शहर, गोंदिया जिल्हा,अमरावती शहर, अकोला शहर, नांदेड शहर, परभणी शहर, हिंगोली, जालना, औरंगाबाद शहर, औरंगाबाद जिल्हा, जळगाव शहर, धुळे शहर, धुळे जिल्हा, मालेगाव शहर, वसई विरार शहर, पालघर जिल्हा, मीरा भायंदर शहर, भिवंडी शहर या ठिकाणी कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही.  

गरज असेल तर राज्य सरकार अदर पूनावाला यांना अधिक सुरक्षा देईल: मुंबई हायकोर्ट

दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ४० लाख ८६ हजार ११० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५६ लाख ७२ हजार १८० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात २२ लाख १८ हजार २७८ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, १९ हजार ९९६ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसMumbaiमुंबईState Governmentराज्य सरकार