शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

Maharashtra Rain| राज्यात पाऊस ओसरतोय; धरणांत पाणीसाठा वाढल्याने दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 10:55 IST

राज्यातील एकाही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही..

पुणे : मध्य भारतावर असलेला कमी दाबाचा पट्ट्याचा प्रभाव कमी होत आहे. तसेच सौराष्ट्र व कच्छच्या प्रदेशात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा ओमानकडे सरकत असून, त्यामुळे अरबी समुद्रावरून आर्द्रता खेचली जात आहे. तसेच बंगालच्या उपसागरावरून राज्यात येणारी आर्द्रताही कमी आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून येत्या पाच दिवसांत राज्यातील पाऊस कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील एकाही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही.

राज्यात गेल्या आठवडाभरापासून अनेक भागांत विशेषकरून कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट परिसर, मराठवाडा व पूर्व विदर्भात अतिवृष्टी झाली. मात्र, येत्या पाच दिवसांत पावसात घट होणार असल्याचा अंदाज आहे. याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, ‘मध्य भारतावर असलेला कमी दाबाचा पट्टा कमी होत आहे. तसेच सौराष्ट्र व कच्छच्या प्रदेशात एक कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. हा पट्टा अरबी समुद्रातून आर्द्रता खेचून घेत आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांसोबत असलेली आर्द्रता कमी होत आहे. तसेच मान्सूनचा कमी दाबाचा पट्टाही दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांतील पाऊस कमी होत आहे. तसेच राज्यातही तो कमी होत आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरावरील ओडिशा किनारपट्टीवरील कमी दाबाचे क्षेत्र स्थिर असले तरी त्याला अरबी समुद्रातून ओढून घेणारा पट्टा वर सरकला आहे. त्यामुळे कोकण व पूर्व विदर्भात सर्वदूर पाऊस राहील; पण त्याची तीव्रता कमी होत आहे; तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात केवळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.’

पुणे शहरातही शुक्रवारी केवळ हलक्या पावसाने हजेरी लावली. अधूनमधून ऊनही पडले. सायंकाळी पुन्हा हलक्या सरींनी हजेरी लावली. पाऊस कमी झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. खडकवासला प्रकल्पाच्या धरण क्षेत्रांतही पाऊस कमी झाला असून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चारही धरणांत एकत्रित १६ टीएमसी अर्थात ५४.६९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. शहरात पुढील पाच दिवसांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रात्री साडेआठपर्यंत झालेला पाऊस : शिवाजीनगर ४.६, लोहगाव ५.४ , मगरपट्टा ५.५, लवळे ८.५, चिंचवड १३.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र