शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

महाराष्ट्रात परिस्थिती स्थिर; रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुटवडा दूर होतोय; आदित्य ठाकरे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 21:03 IST

Coronavirus : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे रुग्णवाढ. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा दूर झाल्याची आदित्य ठाकरेंची माहिती.

ठळक मुद्देराज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे रुग्णवाढ. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा दूर झाल्याची आदित्य ठाकरेंची माहिती.

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता. दरम्यान, आता ऑक्सिजनच्या बाबतीत महाराष्ट्रातील परिस्थिती स्थिर आहे, असं प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. तसंच सध्या रेमडेसिवीरचा होत असलेला काळाबाजार रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रासोबत आणि काही कंपन्यांच्या सहकार्यानं  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रशासनानं चर्चा केली आणि आता ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची कमतरता दूर झाली आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल याचा विचारही केला नव्हता. आता आपल्याला तिसऱ्या लाटेबाबतही तयार राहावं लागणार असल्याचंही ते म्हणाले. सध्या लोकांमध्ये इतकी भीती बसली आहे की हलकी लक्षणं असलेल्या लोकांनाही रुग्णालयात जायचं आहे. बेड्स बाबत किती सोय करण्यात आली आहे असा सवाल आदित्य ठाकरे यांना करण्यात आला. "जंबो सेटर्स महाराष्ट्रातच सर्वात पहिले उभारण्यात आले. ५ लाखांच्या आसपास महाराष्ट्रात बेड्स तयार केले गेले आहेत. लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागणं आवश्यक आहे. उपचारात कोणत्याही प्रकारची कमतरता दिसणार नाही कारण टास्क फोर्सच सारखीच आहे," असं उत्तर देताना ते म्हणाले. एनडीटीव्हीनं आयोजित केलेल्या NDTV Solutions Summit या कार्यक्रमादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.काही तरूण निष्काळजी"ज्या तरूणांना कोरोनाच्या प्रसाराची भीती नाही ते निष्काळजीपणे वागत आहे. त्यांनी बिलकुल घाबरून जाऊ नये. पण हे सर्दी, खोकला नाही. अशी काही लोकंही पाहिली ज्यांनी चाचणी केली नाही आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हा आजार बिलकुल हलक्यारितीनं घेऊ नये. डॉक्टर आणि प्रशासनावर भरवसा ठेवावा आणि काळजी घ्यावी," असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं. प्रवासी मजुरांवरही भाष्य"गेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक प्रवासी मजूर महाराष्ट्रातून परतले होते. परंतु यावेळी आम्ही ये-जा थांबवली नाही. यावेळी त्यावेळसारखी परिस्थिती नाही. गेल्या लॉकडाऊनमधून सर्वांनीच धडा घेतला आहे. आता परिस्थिती पहिल्यापेक्षा ठीक आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र