शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 10:36 IST

Maharashtra Politics : राज्यात विधानसभा निवडणुकांची काही दिवसात घोषणा होणार असून सर्वच पक्षांनी तयारी सुरू आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) :  राज्यात विधानसभा निवडणुकांची काही दिवसात घोषणा होणार असून सर्वच पक्षांनी तयारी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काल उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या भाषणात ते महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करत असल्याचे समोर आले आहे. या विधानावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

"लग्नाला पोरगी पाहिजे असेल, तर पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी स्मार्ट हवी असेल, तर ती तुमच्या माझ्यासारख्या पोरांना भेटत नाही, नोकरीवाल्यांना भेटते.  दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते, ज्यांचा पानठेला आहे, धंदा किराणा दुकान आहे, अशा माणसांना दोन नंबरची पोरगी भेटते आणि तीन नंबरचा गाळ राहिलेली पोरगी शेतकऱ्यांच्या पोरांना भेटते. शेतकऱ्यांच्या पोरांचं काही खरं राहिले नाही, अशा वादग्रस्त विधानाचा जाहीर सभेतील एक व्हिडीओ बुधवारी आमदार देवेंद्र भुयार यांचा व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भुयार यांच्यावर टीका केली. दरम्यान, आता या टीकेला अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं

आमदार देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, "देवेंद्र भुयार यांच्या विधानाचा विपर्यास करुन त्यावर राजकीय पोळी भाजण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत, त्यांनी ते वक्तव्य आधी ऐकावं. विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांच्या मुलांचीही अवस्था बिकट आहे. मराठवाडा आणि विदर्भात मुलांना ३५ शी ओलांडल्यानंतरही मुली भेटणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यालाच वाटते आपली मुलगी शेतकऱ्याच्या घरी सून म्हणून जाऊ नये. हीच वस्तुस्थिती आमदार भुयार यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मांडलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा सोईच्या पद्धतीने घेतले गेले. 

"देवेंद्र भुयार एवढे वादग्रस्त बोलले नाहीत. ते विधान फक्त आता रंगवले जात आहे. ते एक शेतकरी पुत्र आहेत. त्यांच्या विधानाचा विपर्यास करुन जाणीवपूर्वक अजितदादा आणि त्यांच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न सूरू आहे, असा आरोपही आमदार अमोल मिटकरी यांनी केला.    

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmol Mitkariअमोल मिटकरी