शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत'; मोदींच्या विधानावर राऊत म्हणातात, 'स्वाभिमान नावाची गोष्ट...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 10:47 IST

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंवर कुठलंही संकट आलं तरी मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

Sanjay Raut On Narendra Modi : राज्यात एकाकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उडत असताना दुसरीकडे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या मुलाखतींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंना सोबत न घेता तुम्ही मुख्यमंत्री बना असे उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानतंर आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, असं विधान केलं आहे. त्यावर आता प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी निवडणूक हरतायत म्हणून हे सगळं बोलत आहेत असं म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असतानाच पंतप्रधान मोदींनी दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याबाबत अनेक महत्त्वाची विधानं केली आहेत. टीव्ही९ मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर कुठलंही संकट आलं तरी मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन, असे म्हटलं आहे. तसेच  शरद पवारांना या वयात कुटुंब सांभाळता आलं नाही असं मोदी यांनी म्हटलं आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी खोटं बोलतात, असे प्रत्युत्तर दिलं आहे.

नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्रात अडचणी निर्माण केल्या

"नरेंद्र मोदी खोटं बोलतात. नरेंद्र मोदी हे स्वतः अडचणीत आहेत. अडचणीत असलेला व्यापारी हा आपल्या फायद्यासाठी खोटं बोलतो, असं चाणक्यने सांगितले आहे. मोदींना चाण्यकाचे फार वेड आहे. नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्रात आणि शिवसेनेत अडचणी निर्माण केल्या. त्यांना एवढा जर प्रेमाना पान्हा फुटला असता तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडली नसती. बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव एका बेमान माणसाला देण्याचं कृत्य केलं नसतं. बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण एका बेमान माणसाच्या हातात ठेवला नसता. तेव्हा आता त्याचे उफाळून आलेलं प्रेम हे खोटं आहे. मोदींनी दरवाजे उघडले तरी त्याच्या समोर उभं राहणार नाही. स्वाभिमान नावाची गोष्ट या महाराष्ट्रात शिल्लक आहे. तसेच याचा अर्थ असाही आहे की नरेंद्र मोदी निवडणूक हरतायत. त्यांना बहुमत मिळत नाहीये म्हणून ते हे दरवाजे, फटी, खिडक्या उघडायच्या मागे लागले आहेत," असं संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

"उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. ते जेव्हा आजारी होते तेव्हा मी त्यांना फोन केला होता. रश्मी वहिनींना रोज फोन करुन मी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करायचो. तसंच ऑपरेशन करण्यापूर्वी त्यांनी मला फोन केला होता. आपका क्या विचार है? असं मला विचारलं होतं मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही ऑपरेशन करा, बाकीची चिंता सोडा. शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर जर कुठलं संकट उद्या आलं तर मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन. मात्र बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडल," असं मोदींनी मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

शिंदेंना मुख्यमंत्री करुन बाळासाहेबांना आदरांजली दिली - मोदी

"बाळासाहेब ठाकरेंचं माझ्यावर खूप प्रेम होतं. त्यांची आपुलकी, प्रेम हे मी कधीही विसरु शकणार नाही. आजच्या घडीला महाराष्ट्रात आमचे सर्वाधिक आमदार आहेत. तरीही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊन आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. मी ही बाळासाहेब ठाकरेंना वाहिलेली आदरांजली आहे. बाळासाहेब ठाकरेंवर माझी खूप श्रद्धा आहे, मी त्यांचा आदर आजही करतो आणि यापुढे आयुष्यभर करत राहिन," असंही मोदी म्हणाले. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे