शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

'उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत'; मोदींच्या विधानावर राऊत म्हणातात, 'स्वाभिमान नावाची गोष्ट...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 10:47 IST

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंवर कुठलंही संकट आलं तरी मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

Sanjay Raut On Narendra Modi : राज्यात एकाकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उडत असताना दुसरीकडे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या मुलाखतींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंना सोबत न घेता तुम्ही मुख्यमंत्री बना असे उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानतंर आता एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, असं विधान केलं आहे. त्यावर आता प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी निवडणूक हरतायत म्हणून हे सगळं बोलत आहेत असं म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असतानाच पंतप्रधान मोदींनी दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याबाबत अनेक महत्त्वाची विधानं केली आहेत. टीव्ही९ मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर कुठलंही संकट आलं तरी मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन, असे म्हटलं आहे. तसेच  शरद पवारांना या वयात कुटुंब सांभाळता आलं नाही असं मोदी यांनी म्हटलं आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी खोटं बोलतात, असे प्रत्युत्तर दिलं आहे.

नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्रात अडचणी निर्माण केल्या

"नरेंद्र मोदी खोटं बोलतात. नरेंद्र मोदी हे स्वतः अडचणीत आहेत. अडचणीत असलेला व्यापारी हा आपल्या फायद्यासाठी खोटं बोलतो, असं चाणक्यने सांगितले आहे. मोदींना चाण्यकाचे फार वेड आहे. नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्रात आणि शिवसेनेत अडचणी निर्माण केल्या. त्यांना एवढा जर प्रेमाना पान्हा फुटला असता तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडली नसती. बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव एका बेमान माणसाला देण्याचं कृत्य केलं नसतं. बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण एका बेमान माणसाच्या हातात ठेवला नसता. तेव्हा आता त्याचे उफाळून आलेलं प्रेम हे खोटं आहे. मोदींनी दरवाजे उघडले तरी त्याच्या समोर उभं राहणार नाही. स्वाभिमान नावाची गोष्ट या महाराष्ट्रात शिल्लक आहे. तसेच याचा अर्थ असाही आहे की नरेंद्र मोदी निवडणूक हरतायत. त्यांना बहुमत मिळत नाहीये म्हणून ते हे दरवाजे, फटी, खिडक्या उघडायच्या मागे लागले आहेत," असं संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

"उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. ते जेव्हा आजारी होते तेव्हा मी त्यांना फोन केला होता. रश्मी वहिनींना रोज फोन करुन मी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करायचो. तसंच ऑपरेशन करण्यापूर्वी त्यांनी मला फोन केला होता. आपका क्या विचार है? असं मला विचारलं होतं मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही ऑपरेशन करा, बाकीची चिंता सोडा. शरीराकडे लक्ष द्या. बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचा मान सन्मान करणारच. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर जर कुठलं संकट उद्या आलं तर मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन. मात्र बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडल," असं मोदींनी मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

शिंदेंना मुख्यमंत्री करुन बाळासाहेबांना आदरांजली दिली - मोदी

"बाळासाहेब ठाकरेंचं माझ्यावर खूप प्रेम होतं. त्यांची आपुलकी, प्रेम हे मी कधीही विसरु शकणार नाही. आजच्या घडीला महाराष्ट्रात आमचे सर्वाधिक आमदार आहेत. तरीही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊन आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. मी ही बाळासाहेब ठाकरेंना वाहिलेली आदरांजली आहे. बाळासाहेब ठाकरेंवर माझी खूप श्रद्धा आहे, मी त्यांचा आदर आजही करतो आणि यापुढे आयुष्यभर करत राहिन," असंही मोदी म्हणाले. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे