शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 12:16 IST

ज्याप्रकारची भाषा राजकारणात वापरली जातेय. त्यांना कान धरून पुन्हा जमिनीवर आणणं हे शिकवणं, सांगणं, समजावून सांगणे हे तुमचं कर्तव्य आहे असं मी मानतो. त्या अधिकार वाणीने तुम्ही बोलू शकता, सांगू शकता असं राज ठाकरेंनी सांगितले. 

पुणे - महाराष्ट्रातील राजकीय भाषा खालच्या स्तराला गेली आहे. या राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी केले पाहिजे. कुठल्याही ट्रोलिंगचा विचार करू नका. राजकारण्यांना ठणकावून सांगण्याची गरज आहे असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात केले आहे. ९८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी या काळात होणार आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हाचं राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील सर्वात छोटं भाषण मी आज करणार आहे. साहित्यिकांसमोर आपण काय बोलणार, ज्यांची भाषा ऐकून आम्ही पुढे जातो, त्यांच्यासमोर बोलायचं नसते तर ऐकायचं असते. एवढी उज्ज्वल परंपरा साहित्यिकांशी आहे. महाराष्ट्राचं वेगळेपण इतर राज्यांपेक्षा काय हे इथं दिसून येते. मराठी साहित्य वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल, मदत लागेल त्यावेळी आम्ही आहोत. महाराष्ट्रातले साहित्यिक गेले अनेक वर्ष मी पाहत आलोय. मराठीबाणा प्रत्येकाच्या मनात अंगात रुजलेला असायचा. योग्यवेळी राजकारण्यांना जे ठणकावून सांगणे ही धमक, हिंमत जी काही वर्षापूर्वी होती ती आज कुठे तरी कमी दिसतेय असं वाटतं. महाराष्ट्रात चाललेला जो खेळ, सर्कस झालीय, कुणी विदुषकी चाळे करतंय, मंत्रालयात कुणी जाळ्यावर उडी मारतंय. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी अनेक लोक आहेत त्यांना जाळ्यांशिवाय उड्या मारायला लावलं पाहिजे. ज्याप्रकारची भाषा राजकारणात वापरली जातेय. त्यांना कान धरून पुन्हा जमिनीवर आणणं हे शिकवणं, सांगणं, समजावून सांगणे हे तुमचं कर्तव्य आहे असं मी मानतो. त्या अधिकार वाणीने तुम्ही बोलू शकता, सांगू शकता असं राज ठाकरेंनी सांगितले. 

तसेच आम्ही बोललं ट्रोल होते असं तुम्हाला वाटतं परंतु ट्रोलचा विचार करू नका. मी आजपर्यंत अनेक भाषणे दिली आहे, जे बोलायचे ते बोललो आहे  परंतु सोशल मीडियात ज्या गोष्टी येतात त्या मी वाचायला जात नाही. त्या भानगडीत जात नाही. माझे बोलून झालंय ना, मग विषय संपला. कुठल्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायला मी जात नाही. जे तुमच्यावर प्रेम करतात ते स्पष्टीकरण मागत नाही आणि जे तुमचा द्वेष करतायेत ते तुमचं स्पष्टीकरण ऐकत नाही. साहित्यिकांनी ही भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील राजकीय भाषा इतक्या खालच्या स्ताराला गेली, त्यांना समजवणारं कुणी नाही. ज्यांना बुर्जुग म्हणावे ते त्यांच्या आहारी लागलेत. ही जबाबदारी साहित्यिकांनी हाती घेणे गरजेचे आहे असं आवाहन राज ठाकरेंनी मराठी साहित्यिकांना केले. 

दरम्यान, सध्या महाराष्ट्रात सामाजिक चळवळ साहित्यिकांनी उभी करणे गरजेचे वाटते. ज्याप्रकारची भाषा राजकारणात येतेय, आज जी लहान मुले आहेत जे भविष्यात राजकारणात येऊ इच्छितात त्यांना ही भाषा म्हणजे राजकारण आहे वाटतं. वाट्टेल ते बोलतात ते माध्यमे दाखवतात. माध्यमांनी हे दाखवण्याचं बंद केले तर हे बंद होईल. राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी करावे असंही राज ठाकरेंनी सांगितले. त्याशिवाय संजय नाहर यांचं माझ्या वडिलांवर प्रचंड प्रेम, बहुदा त्यामुळेच माझ्यावरही असेल. संजय नाहर हा चळवळीतला माणूस, त्यातून काश्मीरपासून त्यांची संस्था कार्यरत आहे. या ऐतिहासिक वास्तूत मला बोलावलं त्याबद्दल मी आभार मानतो असं राज पुढे म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनMNSमनसेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४