शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 12:16 IST

ज्याप्रकारची भाषा राजकारणात वापरली जातेय. त्यांना कान धरून पुन्हा जमिनीवर आणणं हे शिकवणं, सांगणं, समजावून सांगणे हे तुमचं कर्तव्य आहे असं मी मानतो. त्या अधिकार वाणीने तुम्ही बोलू शकता, सांगू शकता असं राज ठाकरेंनी सांगितले. 

पुणे - महाराष्ट्रातील राजकीय भाषा खालच्या स्तराला गेली आहे. या राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी केले पाहिजे. कुठल्याही ट्रोलिंगचा विचार करू नका. राजकारण्यांना ठणकावून सांगण्याची गरज आहे असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात केले आहे. ९८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी या काळात होणार आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हाचं राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील सर्वात छोटं भाषण मी आज करणार आहे. साहित्यिकांसमोर आपण काय बोलणार, ज्यांची भाषा ऐकून आम्ही पुढे जातो, त्यांच्यासमोर बोलायचं नसते तर ऐकायचं असते. एवढी उज्ज्वल परंपरा साहित्यिकांशी आहे. महाराष्ट्राचं वेगळेपण इतर राज्यांपेक्षा काय हे इथं दिसून येते. मराठी साहित्य वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल, मदत लागेल त्यावेळी आम्ही आहोत. महाराष्ट्रातले साहित्यिक गेले अनेक वर्ष मी पाहत आलोय. मराठीबाणा प्रत्येकाच्या मनात अंगात रुजलेला असायचा. योग्यवेळी राजकारण्यांना जे ठणकावून सांगणे ही धमक, हिंमत जी काही वर्षापूर्वी होती ती आज कुठे तरी कमी दिसतेय असं वाटतं. महाराष्ट्रात चाललेला जो खेळ, सर्कस झालीय, कुणी विदुषकी चाळे करतंय, मंत्रालयात कुणी जाळ्यावर उडी मारतंय. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी अनेक लोक आहेत त्यांना जाळ्यांशिवाय उड्या मारायला लावलं पाहिजे. ज्याप्रकारची भाषा राजकारणात वापरली जातेय. त्यांना कान धरून पुन्हा जमिनीवर आणणं हे शिकवणं, सांगणं, समजावून सांगणे हे तुमचं कर्तव्य आहे असं मी मानतो. त्या अधिकार वाणीने तुम्ही बोलू शकता, सांगू शकता असं राज ठाकरेंनी सांगितले. 

तसेच आम्ही बोललं ट्रोल होते असं तुम्हाला वाटतं परंतु ट्रोलचा विचार करू नका. मी आजपर्यंत अनेक भाषणे दिली आहे, जे बोलायचे ते बोललो आहे  परंतु सोशल मीडियात ज्या गोष्टी येतात त्या मी वाचायला जात नाही. त्या भानगडीत जात नाही. माझे बोलून झालंय ना, मग विषय संपला. कुठल्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायला मी जात नाही. जे तुमच्यावर प्रेम करतात ते स्पष्टीकरण मागत नाही आणि जे तुमचा द्वेष करतायेत ते तुमचं स्पष्टीकरण ऐकत नाही. साहित्यिकांनी ही भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील राजकीय भाषा इतक्या खालच्या स्ताराला गेली, त्यांना समजवणारं कुणी नाही. ज्यांना बुर्जुग म्हणावे ते त्यांच्या आहारी लागलेत. ही जबाबदारी साहित्यिकांनी हाती घेणे गरजेचे आहे असं आवाहन राज ठाकरेंनी मराठी साहित्यिकांना केले. 

दरम्यान, सध्या महाराष्ट्रात सामाजिक चळवळ साहित्यिकांनी उभी करणे गरजेचे वाटते. ज्याप्रकारची भाषा राजकारणात येतेय, आज जी लहान मुले आहेत जे भविष्यात राजकारणात येऊ इच्छितात त्यांना ही भाषा म्हणजे राजकारण आहे वाटतं. वाट्टेल ते बोलतात ते माध्यमे दाखवतात. माध्यमांनी हे दाखवण्याचं बंद केले तर हे बंद होईल. राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचं काम साहित्यिकांनी करावे असंही राज ठाकरेंनी सांगितले. त्याशिवाय संजय नाहर यांचं माझ्या वडिलांवर प्रचंड प्रेम, बहुदा त्यामुळेच माझ्यावरही असेल. संजय नाहर हा चळवळीतला माणूस, त्यातून काश्मीरपासून त्यांची संस्था कार्यरत आहे. या ऐतिहासिक वास्तूत मला बोलावलं त्याबद्दल मी आभार मानतो असं राज पुढे म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनMNSमनसेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४