शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

Maharashtra Politics: जळगावला गुलाबराव पाटील, औरंगाबादला भुमरे; अखेर शिंदे-फडणवीस सरकारचे पालकमंत्री ठरले!

By यदू जोशी | Updated: September 24, 2022 19:28 IST

पालकमंत्र्यांची नावे थोड्याच वेळात जाहीर होणार

यदु जोशी | लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेले तब्बल दीड महिना लटकलेली पालकमंत्र्यांची नियुक्ती थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. नागपूर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे - चंद्रकांत पाटील, जळगाव - गुलाबराव पाटील, औरंगाबाद - संदीपान भुमरे, नाशिक - गिरीश महाजन असे पालकमंत्री निश्चित झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ३० जूनला घेतली होती. ९ ऑगस्टला भाजपच्या ९ तर शिंदे गटाच्या ९ कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. तेव्हापासून पालकमंत्रीच नियुक्त न झाल्याने अनेक अडचणी येत आहेत. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकी नाहीत, पालकमंत्र्यांच्या अखत्यारित येणारे निर्णयही होवू शकलेले नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे पालकमंत्रीच नसल्याने सरकार स्थिर नसल्याची मोठ्या प्रमाणात भावना होती.

देवेंद्र फडणवीस नागपूर, चंद्रकांत पाटील पुणे

देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार अशी चर्चा होती पण ते नागपूरचेच पालकमंत्री असतील.पुण्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे असेल, अशी माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे आहेत. त्याच जिल्ह्यात भाजपचे रविंद्र चव्हाण मंत्री आहेत. मुख्यमंत्री सहसा पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवत नाहीत पण याला काही अपवाददेखील आहेत. नारायण राणे यांनी सिंधुदुर्गचे तर विलासराव देशमुख यांनी काही काळ लातूरचे पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवले होते. शिंदे यांनी ठाण्याचे पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवायचे की चव्हाण यांना द्यायचे हा निर्णय सर्वस्वी त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे.

सध्या मुख्यमंत्र्यांसह  २० मंत्री आहेत. त्यामुळे एकेका बहुतेक मंत्र्यांकडे दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद दिले जाईल. मात्र, विस्तारानंतर पालकमंत्रीपदांचे पुन्हा वाटप केले जाणार आहे.

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली (नियोजन मंत्री देखील)
  • राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर
  • सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर,गोंदिया
  • चंद्रकांत पाटील- पुणे
  • विजयकुमार गावित- नंदुरबार
  • गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड
  • गुलाबराव पाटील - जळगाव, बुलढाणा
  • दादा भुसे- नाशिक, 
  • संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
  • सुरेश खाडे- सांगली
  • संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
  • उदय सामंत- रत्नागिरी, रायगड
  • तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद(धाराशिव)
  • रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग
  • अब्दुल सत्तार- हिंगोली
  • दीपक केसरकर- मुंबई शहर, कोल्हापूर
  • अतुल सावे- जालना, बीड
  • शंभूराज देसाई- सातारा, ठाणे
  • मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

 

भुमरेंकडे औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यातील संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार (शिंदे गट) आणि अतुल सावे (भाजप) असे तीन मंत्री आहेत. पालकमंत्रीपद भुमरे यांना दिले जाणार आहे. विधानसभेचे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच आमदार हे शिंदे गटात आहेत. भुमरे यांना सत्तार यांच्या तुलनेने कमी महत्त्वाचे खाते दिले गेले. त्याची भरपाई त्यांना पालकमंत्रीपद देवून केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळGulabrao Patilगुलाबराव पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसguardian ministerपालक मंत्री