शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

Maharashtra Politics : अनिल परब म्हणाले, तो नेपाळी, ठाकरे गालातल्या गालात हसले; सभागृहात नेमकं काय घडलं?

By संतोष कनमुसे | Updated: March 25, 2025 18:36 IST

Maharashtra Politics : आज विधान परिषदेत आमदार अनिल परब यांनी मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता निशाणा साधला.

Maharashtra Politics ( Marathi News ) : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मंत्री नितेश राणे यांनी हलाल आणि झटका मासांवरुन राजकारण तापले होते. राणे यांनी 'मल्हार सर्टिफिकेशन' सुरु केले आहे. दरम्यान, यावरुन आज विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले. यावेळी सभागृहात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. आमदार अनिल परब यांचे भाषण ऐकून ठाकरेही गालातल्या गालात हसत असल्याचे पाहायला मिळाले. 

आज विधान परिषदेत संविधानावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आमदार अनिल परब यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना आमदार अनिल परब म्हणाले, भारताची घटना ही चार स्तंभावरती आहे. चारही स्तंभाचा आपला संबंध येतो. याद्वारेच आपण काम करत असतो. भारताची राज्यघटना मजबूत आहे. पण, शेवटच्या माणसापर्यंत ते पोहोचले आहे की नाही? याचे महत्व लोकांपर्यंत पोहोचले आहे का? आज आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतो. कायदे नियम घटनेच्या आधारावर बनले आहेत, असंही अनिल परब म्हणाले. 

"माझा सगासोयरा अपराधी असेल, तरीही त्याला शिक्षा करेन, कारण....', CM फडणवीसांचं विधान

"घटनेमुळे मला बोलण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. माझ्या बोलण्यामुळे दुसऱ्याच्या अधिकारावर काही गदा येते का हे पाहणे माझे काम आहे. कोणही उटतंय आणि कोणावरही काहीही बोलतंय. मानाच्या स्थानावरील लोकांची विटंबना करत आहे. घटनेचा मुळ पाया हा समानतेचा आहे. मी काय खायचं, काय खायचं नाही हा अधिकार माझा आहे. हल्ली काय झालंय, मी मौसाहरी खायचं नाही. मी जर मौसाहरी असेल तर सोसायटीमध्ये घर मिळणार नाही. हा अधिकार कोणी दिला? हा अधिकार घटनेने दिला आहे का?, असा सवालही अनिल परब यांनी केला.

राणेंवर नाव न घेता टीका 

"मटण झटक्याचं खायचं की हलालचं खायचं हे कोण ठरवणार? मंत्री ठरवायला लागले. हा कायदा कोणी आणला? ज्या घटनेने मला राहण्याचा आणि खाण्याचा अधिकार दिला आहे.  मंत्री उठतात आणि सांगतात मल्हार असेल तरच खायचं नाहीतर खायचं नाही. म्हणजे तुम्ही दोन धर्मात फूट पाडत आहात. आम्ही हिंदू आहोत आम्हाला बाळासाहेबांनी जे कोण असतील मग ते हिंदू असतील किंवा मुस्लिम असेल जो कोणी देशाच्या विरोधात काम करत असेल तो आपला शत्रू आहे. त्या बॉम्ब ब्लॉस्टमध्ये मुस्लिम लोक आढळले म्हणून त्यावेळी बाळासाहेबांची वाक्ये होती. आज काय झालंय, माझ्या इकडे एका सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमन आहे. तो रात्रभर जागते रहो असं ओरडत असतो. म्हणून त्याला वाटतं आम्ही त्याच्यामुळे सुरक्षित आहोत. असाच एक नेपाळी महाराष्ट्रात फिरत आहे. त्यांना असं वाटतंय त्यांच्यामुळे हिंदू धर्म टीकलाय, अशी टीका मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता परब यांनी केली. हिंदू धर्म सांभाळायला आमच्यात तेवढी ताकद आहे, असा टोलाही अनिल परब यांनी लगावला. यावेळी परब यांच्या बाजूलाच ठाकरे बसले होते, ठाकरे यांना हसू आवरता आले नाही.

टॅग्स :Anil Parabअनिल परबMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे