शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Maharashtra Politics : अनिल परब म्हणाले, तो नेपाळी, ठाकरे गालातल्या गालात हसले; सभागृहात नेमकं काय घडलं?

By संतोष कनमुसे | Updated: March 25, 2025 18:36 IST

Maharashtra Politics : आज विधान परिषदेत आमदार अनिल परब यांनी मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता निशाणा साधला.

Maharashtra Politics ( Marathi News ) : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मंत्री नितेश राणे यांनी हलाल आणि झटका मासांवरुन राजकारण तापले होते. राणे यांनी 'मल्हार सर्टिफिकेशन' सुरु केले आहे. दरम्यान, यावरुन आज विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले. यावेळी सभागृहात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. आमदार अनिल परब यांचे भाषण ऐकून ठाकरेही गालातल्या गालात हसत असल्याचे पाहायला मिळाले. 

आज विधान परिषदेत संविधानावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आमदार अनिल परब यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना आमदार अनिल परब म्हणाले, भारताची घटना ही चार स्तंभावरती आहे. चारही स्तंभाचा आपला संबंध येतो. याद्वारेच आपण काम करत असतो. भारताची राज्यघटना मजबूत आहे. पण, शेवटच्या माणसापर्यंत ते पोहोचले आहे की नाही? याचे महत्व लोकांपर्यंत पोहोचले आहे का? आज आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतो. कायदे नियम घटनेच्या आधारावर बनले आहेत, असंही अनिल परब म्हणाले. 

"माझा सगासोयरा अपराधी असेल, तरीही त्याला शिक्षा करेन, कारण....', CM फडणवीसांचं विधान

"घटनेमुळे मला बोलण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. माझ्या बोलण्यामुळे दुसऱ्याच्या अधिकारावर काही गदा येते का हे पाहणे माझे काम आहे. कोणही उटतंय आणि कोणावरही काहीही बोलतंय. मानाच्या स्थानावरील लोकांची विटंबना करत आहे. घटनेचा मुळ पाया हा समानतेचा आहे. मी काय खायचं, काय खायचं नाही हा अधिकार माझा आहे. हल्ली काय झालंय, मी मौसाहरी खायचं नाही. मी जर मौसाहरी असेल तर सोसायटीमध्ये घर मिळणार नाही. हा अधिकार कोणी दिला? हा अधिकार घटनेने दिला आहे का?, असा सवालही अनिल परब यांनी केला.

राणेंवर नाव न घेता टीका 

"मटण झटक्याचं खायचं की हलालचं खायचं हे कोण ठरवणार? मंत्री ठरवायला लागले. हा कायदा कोणी आणला? ज्या घटनेने मला राहण्याचा आणि खाण्याचा अधिकार दिला आहे.  मंत्री उठतात आणि सांगतात मल्हार असेल तरच खायचं नाहीतर खायचं नाही. म्हणजे तुम्ही दोन धर्मात फूट पाडत आहात. आम्ही हिंदू आहोत आम्हाला बाळासाहेबांनी जे कोण असतील मग ते हिंदू असतील किंवा मुस्लिम असेल जो कोणी देशाच्या विरोधात काम करत असेल तो आपला शत्रू आहे. त्या बॉम्ब ब्लॉस्टमध्ये मुस्लिम लोक आढळले म्हणून त्यावेळी बाळासाहेबांची वाक्ये होती. आज काय झालंय, माझ्या इकडे एका सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमन आहे. तो रात्रभर जागते रहो असं ओरडत असतो. म्हणून त्याला वाटतं आम्ही त्याच्यामुळे सुरक्षित आहोत. असाच एक नेपाळी महाराष्ट्रात फिरत आहे. त्यांना असं वाटतंय त्यांच्यामुळे हिंदू धर्म टीकलाय, अशी टीका मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता परब यांनी केली. हिंदू धर्म सांभाळायला आमच्यात तेवढी ताकद आहे, असा टोलाही अनिल परब यांनी लगावला. यावेळी परब यांच्या बाजूलाच ठाकरे बसले होते, ठाकरे यांना हसू आवरता आले नाही.

टॅग्स :Anil Parabअनिल परबMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे