शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 19:59 IST

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचे बोलले जात आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे विधानसभेपूर्वीच राजकीय वर्तुळात भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री  अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता आमदार बच्चू कडू यांनीही याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

उपमुख्यमंत्री अजित पवार  महायुतीमधून बाहेर पडतील असं विधान कर बच्चू कडू यांनी तसे संकेत असल्याचे म्हटले आहे. गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आज आमदार बच्चू कडू यांनीही याबाबत वक्यव्य केले. 

आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार

आज पत्रकार परिषदेत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केले. पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू यांनी माध्यम प्रतिनिधींनी पंकजा मुंडे यांच्याबाबात प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, पंकजा मुंडे यांचे खरं आहे, विधानसभेत आता धनंजय मुंडे आहेत. अजित पवार जर महायुतीतून बाहेर गेले तर त्यांची जागा त्यांना मिळेल. नाही गेले तर पंकजा मुंडे यांना जागा मिळणार नाही. सगळ्या आघाडी आणि युतीमध्ये बऱ्याच फुटफाट होईल असं चित्र वाटत आहे. ते बाहेर पडतील आणि आमची महाशक्ती होईल. त्यांना आमच्या आघाडीत घ्यायचं की नाही हे आमची सुकाणु समिती ठरवेल, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले. ते महायुतीमधून बाहेर पडतील असे काही संकेत आहेत. जसे तुमचे सुत्र असतात तसे आमचेही सुत्र आहेत, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले. या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.  

'दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये'

मनोज जरांगे पाटील यांचं आता तिसर, चौथ उपोषण आहे. या आरक्षणाबाबत जो काही घोळ केला आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. याच मुळात काय कारण आहे ते शोधल पाहिजे. केंद्रात सरकार तुमचं आहे, केंद्रात तुम्ही दहा टक्के वाढवून घ्या. सरकारने आता या भूमिका घेतल्या पाहिजेत. आता कोर्टात टीकेल का नाही हे माहित नाही. राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा अशी दरी निर्माण होत आहे. ओबीसी समाजाला विश्वास देणे महत्वाचे आहे. राजकारणाठी दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024