शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 19:59 IST

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचे बोलले जात आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे विधानसभेपूर्वीच राजकीय वर्तुळात भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री  अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता आमदार बच्चू कडू यांनीही याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

उपमुख्यमंत्री अजित पवार  महायुतीमधून बाहेर पडतील असं विधान कर बच्चू कडू यांनी तसे संकेत असल्याचे म्हटले आहे. गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आज आमदार बच्चू कडू यांनीही याबाबत वक्यव्य केले. 

आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार

आज पत्रकार परिषदेत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केले. पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू यांनी माध्यम प्रतिनिधींनी पंकजा मुंडे यांच्याबाबात प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, पंकजा मुंडे यांचे खरं आहे, विधानसभेत आता धनंजय मुंडे आहेत. अजित पवार जर महायुतीतून बाहेर गेले तर त्यांची जागा त्यांना मिळेल. नाही गेले तर पंकजा मुंडे यांना जागा मिळणार नाही. सगळ्या आघाडी आणि युतीमध्ये बऱ्याच फुटफाट होईल असं चित्र वाटत आहे. ते बाहेर पडतील आणि आमची महाशक्ती होईल. त्यांना आमच्या आघाडीत घ्यायचं की नाही हे आमची सुकाणु समिती ठरवेल, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले. ते महायुतीमधून बाहेर पडतील असे काही संकेत आहेत. जसे तुमचे सुत्र असतात तसे आमचेही सुत्र आहेत, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले. या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.  

'दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये'

मनोज जरांगे पाटील यांचं आता तिसर, चौथ उपोषण आहे. या आरक्षणाबाबत जो काही घोळ केला आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. याच मुळात काय कारण आहे ते शोधल पाहिजे. केंद्रात सरकार तुमचं आहे, केंद्रात तुम्ही दहा टक्के वाढवून घ्या. सरकारने आता या भूमिका घेतल्या पाहिजेत. आता कोर्टात टीकेल का नाही हे माहित नाही. राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा अशी दरी निर्माण होत आहे. ओबीसी समाजाला विश्वास देणे महत्वाचे आहे. राजकारणाठी दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024