शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 14:09 IST

'एकनाथ शिंदेंची शिवसेना लवकरच भाजपमध्ये विलीन होणार आहे.'

Maharashtra Politics: शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरुन भाजपसह अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, 'महाराष्ट्रात असे लोक निवडून आले आहेत, ज्यांच्याबद्दल लोकांनाही माहिती नाही की, ते आमदार आहेत. हे सगळे लोक 'मत चोरी'मुळे आमदार झाले आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा भाजपचे ९०% आमदार मते चोरुन किंवा हेराफेरी करुन आमदार झाले,' असा दावा संजय राऊत यांनी केला.

आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, 'हे देशद्रोही लोक आमच्यावर आरोप करतात. आम्ही कधीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत इतर कोणाचाही फोटो लावला नाही. आता पंतप्रधान मोदींचा मोठा फोटो लावणे सुरू केले आहे. हिम्मत असेल तर पंतप्रधान मोदींपेक्षा आनंद दिघेंचा मोठा फोटो लावून दाखवा. शिंदे गट हळूहळू भाजपमध्ये विलीन होत आहे,' असा दावा राऊत यांनी केला.

जयंत पाटील भाजपात येत नाहीत म्हणून...

'भाजपचे लोक एकमेकांचे बाप काढत आहेत, ही सुरुवात नारायण राणे यांच्या मुलांनी केली. त्यांना फडणवीसांनीच अभय दिले आहे. आमच्याही तोंडूनन एखादा शब्द जातो, पण आम्ही कुणाचा बाप नाही काढला, बापाचे कर्तृत्व नाही काढले. राजारामबापू यांनी सहकारक्षेत्रात फार मोठे योगदान दिले आहे. त्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी निकटचा संबंध आला आहे, त्यांच्या विषयी कोणी बोलावं आणि कोणत्या भाषेत बोलावं, हे जर भाजपच्या लोकांना कळत नसेल, तर त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासला आहे.  फडणवीसांनी त्यासाठी ठराविक माणसे नेमली आहेत. ही टीम फडणवीस आहे. फडणवीसांनी या व्यक्तीला 12 ते 13 वेळा समज दिली, असे मी वृत्त वाचले. जयंत पाटलांवर तुमचा राग यासाठी आहे की, ते तुमच्या पक्षात यायला तयार नाही,' असेही राऊत यावेळी म्हणाले.

प्रताप सरनाईकांवर निशाणा

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांबद्दल राऊत म्हणाले, 'शिंदे गटाचे आव्हान स्विकारत काल रात्रीच ठाण्यात जाऊन आलो आहे. मी शिवसेनेचा नेता आहे. मी एकटा फिरतो. माझ्यासोबत सरकारी पोलीस बंदोबस्त किंवा गाड्यांचा ताफा नसतो. त्यांना आनंद दिघे समजले नाहीत किंवा माहिती नाहीत. त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांनी तो सिनेमा काढला, त्यातील ९० टक्के गोष्टी खोट्या आणि भंपक आहेत.'

त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या विधानाचा देत म्हटले, 'प्रताप सरनाईक यांनी असे विधान केले की, एकनाथ शिंदे यांनी राजन विचारे नावाच्या दगडाला शेंदूर फासला. मग प्रताप सरनाईक नावाच्या धोंड्याला कोणी शेंदूर फासला? उद्धव ठाकरे यांनीच ना...सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेत आमदार आणि मंत्री होण्यासाठी आले. त्यांच्यावर इडीच्या धाडी पडल्यानंतर ते पळून गेले. हा त्यांचा इतिहास आहे. त्यांनी राजन विचारे यांच्याविषयी बोलू नये,' अशी टीका राऊतांनी केली.

मुंबई-दिल्ली बुलेट ट्रेन का केली नाही?

संजय राऊत यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबतही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, 'आम्ही बुलेट ट्रेनला कायम विरोध करणार. कारण, आम्ही कधीच त्याची मागणी केली नव्हती. तुम्ही दिल्लीला मुंबईशी का जोडले नाही? तुम्हाला मुंबईला गुजरातशी जोडण्याची घाई आहे. मुंबईच्या वाहतूक आणि पायाभूत सुविधा पाहा, याचे याचे काही उत्तर आहे का?' असा सवालही त्यांनी यावेळी सरकारला केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना