शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

न्यायालयात कोणाची बाजू मांडू, कोणाविरोधात युक्तिवाद करू?; वकिलांत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 06:02 IST

सत्ता समीकरणांत बदल, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लावला होता.

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत समर्थक आमदारांसह थेट सरकारात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने सत्तेतील सर्व समीकरणे बदलली. त्याचा केवळ राजकारणावरच नव्हे तर न्यायालयीन कामकाजावरही परिणाम झाला आहे. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांविरोधात न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिका सुनावणीला आल्यावर कोणाचा 'पक्ष' मांडू आणि कोणाविरोधात युक्तिवाद करू, अशी संभ्रमावस्था वकिलांमध्ये निर्माण झाली आहे.

सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा लावला होता. त्यात अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासारख्या नेत्यांना अटक झाली. छगन भुजबळ तर तुरुंगवारीही करून आले. दाखल केलेल्या गुन्ह्यातून त्यांना आरोपमुक्त करण्यात आले असले तरी ईडीच्या कचाट्यातून भुजबळ अद्याप सुटलेले नाहीत. संताजी घोरपडे साखर कारखाना गैरव्यवहारसंदर्भात हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या तीन मुलांमागेही सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी लावण्यात आली.

बदललेली परिस्थितीहसन मुश्रीफ यांच्या गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर न्या. एन. डब्ल्यू. सांधे व न्या. आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. त्यावेळी मुश्रीफ यांच्याविरोधात युक्तिवाद करायचा की नाही, याबाबत काही सूचना नसल्याने तपास यंत्रणेच्या वकिलांनी 'बदललेली परिस्थिती' असे कारण देत सुनावणी तहकूब करण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यावेळी खंडपीठाने सरकारी वकिलाची फिरकी घेत विचारले की, सरकारी वकील आरोपीची की राज्य सरकारची बाजू मांडणार? यावर सरकारी वकिलांनी भाष्य करणे टाळले

भुजबळांना टोलाअशीच अवघड परिस्थिती शुक्रवारी छगन भुजबळ यांच्या वकिलाची झाली. भुजबळ यांनी शिंदे- फडणवीस सरकारने विकासकामाना स्थगिती दिल्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, याचिका सुनावणीला आल्यावर वकिलांची पंचाईत झाली. प्रभारी मुख्य न्या. नितीन जामदार व न्या. अरिफ डॉक्टर यांनीही सत्तेत सामील होऊन मंत्रिपद मिळाल्यानंतर आता ही याचिका मागे घेणार का? असा प्रश्न वकिलांना केला. त्यावर वकिलांनी वेळ वाढवून मागितली. २ विशेष न्यायालयांतही हीच परिस्थिती आहे. एरव्ही नेत्यांनी केलेल्या गुन्हेगारी कृत्याचा पाढा न्यायालयासमोर तावातावाने मांडणाऱ्यांना व सरकारने सुडाचे राजकारण केल्याचा आरोप करणाऱ्या वकिलांना सत्तेचा सारिपाट बदलल्यावर कोणाच्या बाजूने बोलू व कोणाच्या विरोधात? असा प्रश्न पडला आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसChhagan Bhujbalछगन भुजबळ