शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Bacchu Kadu: इकडे सरकार कोसळलं अन् तिकडे बच्चू कडूंची फाईल बंद; रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 08:21 IST

एकाबाजूला ठाकरे सरकार कोसळलं आणि दुसरीकडे बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चीट मिळाली आहे. 

मुंबई-

राज्यात सत्ता संघर्षाच्या नाट्यावर अखेर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पडदा पडला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे ठाकरे सरकारवर नामुष्की ओढावली. शिंदे गटात आमदार बच्चू कडू यांचाही समावेश होता. एकाबाजूला ठाकरे सरकार कोसळलं आणि दुसरीकडे बच्चू कडू यांना एका गैरव्यवहार प्रकरणी क्लीन चीट मिळाली आहे. 

तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याचा ठपका बच्चू कडू यांच्यावर होता. या प्रकरणातून बच्चू कडू यांची आता निर्दोष मुक्तता झाली आहे. मूळात अस्तित्वातच नसलेल्या तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी ९५ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता. सिटी कोतवाली पोलिसात बच्चू कडू यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. या संपूर्ण प्रकरणात बच्चू कडू यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं सांगत पोलिसांनी या प्रकरणाची फाईल बंद केली आहे. 

नेमकं प्रकरण काय?अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले बच्चू कडू यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने आर्थिक अपहाराचे गंभीर आरोप केले होते. बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी वळता करीत १ कोटी ९५ लाखांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. याची ठिणगी तीन रस्त्यांच्या कथित कामांवरून पडली. दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. एकूण तीन रस्त्यांच्या कामांत बच्चू कडूंनी अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. यात जिल्हा परिषदेच्या अधिकारावर पालकमंत्र्यांनी अतिक्रमण केल्याचं वंचितनं म्हटलं होतं. यात रस्त्यांचे 'ग्रामा (ग्रामीण मार्ग) क्रमांक' नसतांना कामांना प्रशासकीय मान्यता कशी मिळू शकते, असा सवाल वंचितनं केला होता. दरम्यान, वंचितच्या तक्रारीनंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरांनी या तीन रस्त्यांसह 25 कामांना दिली स्थगिती दिली होती. 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा