शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टातील सुनावणीने शिवसेनेची उमेद वाढली? खासदार अरविंद सावंत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 14:49 IST

Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टात झालेल्या आजच्या सुनावणीनंतर शिवसेनेची उमेद वाढली असून, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आजच्या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्रात झालेली राजकीय उलथापालथ आणि त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारविरोधात शिवसेनेने न्यायालयीन लढाई सुरू केली आहे.   शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकांवर आज झालेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणीसाठी १ ऑगस्ट ही तारीख कोर्टाने दिली आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात झालेल्या आजच्या सुनावणीनंतर शिवसेनेची उमेद वाढली असून, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आजच्या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अरविंद सावंत म्हणाले की, आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. आता अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टासमोरच येणार आहे. इतर कुणालाही त्यावर निर्णय घेता येणार नाही. तसेच सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अधिवेशनातील कामकाजाचं सर्व प्रोसिडिंग सिल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोरबरच सध्याचा घटनाक्रम हा मोठा मुद्दा आणि घटनात्मक पेच असल्याने हा मुद्दा मोठ्या घटनापीठासमोर घेण्याच्या विचारात असल्याचे कोर्टाने सांगितले आहे, तसेच तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे.

दरम्यान, सरन्यायाधीश एनव्ही रमना, जस्टिस कृष्ण मुरारी आणि हिमा कोहली यांच्या घटनापीठासमोर आज महाराष्ट्रातील घडामोडींबाबत दाखल याचिंकांवरील सुनावणी पार पडली. घटनात्मकरीत्या हे प्रकरण अत्यंत महत्वाचं आणि गुंतागुतीचं असल्यानं यापेक्षा मोठ्या खंडपीठाची गरज भासेल असं वाटतंय, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी यावेळी केली आहे. पण सध्यातरी तसे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत असंही ते पुढे म्हणाले आहेत. दुसरीकडे न्यायाधीशांनी दोन्ही पक्षकारांना २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता १ ऑगस्ट रोजीच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतShiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदे