शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टातील सुनावणीने शिवसेनेची उमेद वाढली? खासदार अरविंद सावंत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 14:49 IST

Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टात झालेल्या आजच्या सुनावणीनंतर शिवसेनेची उमेद वाढली असून, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आजच्या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्रात झालेली राजकीय उलथापालथ आणि त्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारविरोधात शिवसेनेने न्यायालयीन लढाई सुरू केली आहे.   शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकांवर आज झालेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणीसाठी १ ऑगस्ट ही तारीख कोर्टाने दिली आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात झालेल्या आजच्या सुनावणीनंतर शिवसेनेची उमेद वाढली असून, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आजच्या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अरविंद सावंत म्हणाले की, आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. आता अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टासमोरच येणार आहे. इतर कुणालाही त्यावर निर्णय घेता येणार नाही. तसेच सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अधिवेशनातील कामकाजाचं सर्व प्रोसिडिंग सिल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोरबरच सध्याचा घटनाक्रम हा मोठा मुद्दा आणि घटनात्मक पेच असल्याने हा मुद्दा मोठ्या घटनापीठासमोर घेण्याच्या विचारात असल्याचे कोर्टाने सांगितले आहे, तसेच तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे.

दरम्यान, सरन्यायाधीश एनव्ही रमना, जस्टिस कृष्ण मुरारी आणि हिमा कोहली यांच्या घटनापीठासमोर आज महाराष्ट्रातील घडामोडींबाबत दाखल याचिंकांवरील सुनावणी पार पडली. घटनात्मकरीत्या हे प्रकरण अत्यंत महत्वाचं आणि गुंतागुतीचं असल्यानं यापेक्षा मोठ्या खंडपीठाची गरज भासेल असं वाटतंय, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी यावेळी केली आहे. पण सध्यातरी तसे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत असंही ते पुढे म्हणाले आहेत. दुसरीकडे न्यायाधीशांनी दोन्ही पक्षकारांना २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता १ ऑगस्ट रोजीच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतShiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदे